शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

विदर्भातील ७५ टक्के कृषिपंप जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:33 AM

कृषिपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष शिल्लक नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात असले तरी विदर्भातील अर्थात नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्ह्यात ७५ टक्के कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे८ महिन्यात २५ टक्के जोडण्या उद्दिष्ट ४१ हजारांचे, जोडण्या फक्त १० हजारांवर

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषिपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष शिल्लक नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात असले तरी विदर्भातील अर्थात नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्ह्यात ७५ टक्के कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. विदर्भातील जवळपास सर्वच परिमंडळात ही स्थिती असल्याने आणि येत्या मार्चपर्यंत संपूर्ण जोडण्या देणे शक्य नसल्याने पुढच्या वर्षी अनुशेषात भर पडण्याचीच शक्यता अधिक आहे.नागपूर परिक्षेत्रामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमिळून ३१ मार्च २०१९ पर्यंत ४१ हजार ७४३ कृषिपंपांना जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १ नोव्हेंबरपर्यंत फक्त १० हजार ८३३ जोडण्या देण्यातच वीज कंपनीला यश आले आहे. हा विचार करता जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांनाच जोडण्या मिळाल्या असून अद्याप ७५ टक्के शेतकरी प्रतीक्षेत आहेत.२०१० पासून या प्रलंबित वीज कृषिपंपांच्या जोडण्या मागे पडण्यात भर पडत चालली आहे. २०१० ते २०१५ या काळात अनुशेषाची संख्या कमी होती. मात्र २०१५ नंतर ही संख्या झपाट्याने वाढल्याचे अर्थात मागणीही वाढल्याचे वीज कंपनीच्या अहवालात दिसत आहे.

सौर कृषिपंपातही मागेजानेवारी-२०१९ पासून राज्यात सौर कृषिपंप देण्याची योजना सरकारने लागू केली. त्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील अर्थात विदर्भातील ११ जिल्ह्यांना २५ हजार पंपांचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी अनुदानही मंजूर केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ५० हजार १७ अर्ज ऑनलाईन आले होते. त्यापैकी ३३ हजार ५५ अर्ज पात्र ठरले. या ११ महिन्याच्या काळामध्ये फक्त २ हजार १६७ सौर कृषिपंपांच्या जोडण्या झाल्या आहेत तर ८२६ सौर पंपांचे काम प्रगतिपथावर असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती