शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ६६.२३ टक्के कोरोनारुग्ण बरे; ५३२ रुग्ण व १६ मृत्यूची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 22:59 IST

देशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भात त्यापेक्षा जास्त ६६.२३ टक्के आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या १६१६१, मृतांची संख्या ४२०

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात रविवारी ५३२ नव्या रुग्णांची व १६ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १६१६१ झाली असून मृतांची संख्या ४२०वर पोहचली आहे. १०७०५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४८१९ रुग्ण उपचाराखाली आहेत. देशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भात त्यापेक्षा जास्त ६६.२३ टक्के आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण देशात २.१५ टक्के असताना विदर्भात किंचित जास्त २.५९ टक्के आहे. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे.

गेल्या पाच दिवसापासून रोज ५०० वर रुग्णांची नोंद होत आहे. विशेषत: नागपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा २३५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५८९७ वर पोहचली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद मंगळवारी झाली. १५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १५४ वर गेली आहे. ३६१५ रुग्ण बरे तर १९६७ रुग्ण उपचार घेत आहेत. नागपूरसोबतच अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ घातला आहे. या जिल्ह्यात ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या २२९४ तर मृत्यूची संख्या ६१ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या ३९६ झाली आहे. जिल्ह्यात तीन मृत्यूची नोंद आहे.

बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण्संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या १३९९ झाली आहे. ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ३४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णसंख्या ६५४ झाली आहे. १६ मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची ११४५ झाली असून ३३ मृत्यूची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. बाधितांची संख्या ५७० झाली आहे. जिल्ह्यात मात्र एकच मृत्यू आहे. भंडारा जिल्ह्यात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या २७१ वर पोहचली आहे. दोन मृत्यूची नोंद आहे.

अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा मंदावली. १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या ११० वर पोहचली आहे. वर्धा जिल्ह्यात सात रुग्णांना बाधा झाल्याने रुग्णसंख्या २४९ झाली आहे, नऊ मृत्यूची नोंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णसंख्या ६०७ तर मृत्यूची संख्या एकवर स्थिरावली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस