शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विदर्भात १,७९,४७७ हेक्टर भौतिक सिंचन अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 20:57 IST

विदर्भ विकास मंडळाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर विदर्भातील भौतिक अनुशेष जवळपास संपला आहे. केवळ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टर भौतिक सिंचन अनुशेष शिल्लक आहे. गोसीखुर्दमुळे नागपूर विभागाचा अनुशेष संपला आहे. जून २०२२ पर्यंत अमरावती विभागातील सिंचनाचा अनुशेषही दूर केला जाईल. यासाठी राज्य सरकारने २०१९-२० साठी अर्थसंकल्पात ७६२ कोटी रुपयाची तरतूद केली असल्याचेही मंडळाने सांगितले. विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरुवारी मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देअमरावती विभागातील जिल्हे प्रभावित, नागपूरचा अनुशेष संपला२०२२ पर्यंत निर्मूलनाचे लक्ष्य, ७६२ कोटीची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ विकास मंडळाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर विदर्भातील भौतिक अनुशेष जवळपास संपला आहे. केवळ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टर भौतिक सिंचन अनुशेष शिल्लक आहे. गोसीखुर्दमुळे नागपूर विभागाचा अनुशेष संपला आहे. जून २०२२ पर्यंत अमरावती विभागातील सिंचनाचा अनुशेषही दूर केला जाईल. यासाठी राज्य सरकारने २०१९-२० साठी अर्थसंकल्पात ७६२ कोटी रुपयाची तरतूद केली असल्याचेही मंडळाने सांगितले.विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरुवारी मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अध्यक्ष आ. संचेती यांनी स्पष्टपणे सांगितले की, १९९४ मध्ये बॅकलॉग अ‍ॅण्ड इंडिकेटर्स कमेटीतर्फे विदर्भातील सिंचनाचा जो अनुशेष उघडकीस आणण्यात आला होता, तो दूर करण्यात आलेला आहे. आता केवळ भौतिक अनुशेष शिल्लक आहे. तो सुद्धा केवळ अमरावती विभागातील चार जिल्ह्यामधील आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ७२,९७१ हेक्टरचा अनुशेष आहे. त्याचप्रकारे अकोलामध्ये ४५,०२८ हेक्टर, वाशिममध्ये ९,२१६ हेक्टर आणि बुलडाणा येथे ५२,२६२ हेक्टर सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे. अनुशेष निर्मूलन व सिंचन सुविधा वाढविण्यासाठी ७६२ कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील बॅकलॉग जून २०२१ पर्यंत व इतर तीन जिल्ह्यातील बॅकलॉग जून २०२२ पर्यंत दूर करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. गोसीखुर्द प्रकल्प व नितीन गडकरी हे केंद्रीय जल संसाधन मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या ३४०० कोटी रुपयाच्या कामामुळे नागपूर विभागचा अनुशेष आता शिल्लक राहिलेला नाही. १९९४ नंतर तयार झालेल्या नवीन अनुशेषाबाबत आ. संचेती यांनी सांगितले की, बॅकलॉग अ‍ॅण्ड इंडिकेटर्स कमिटीच्या आकड्यांवरच काम सुरू आहे. यात कुठलेही संशोधन झालेले नाही.नाराजी नाही, राहणारही नाहीआ. चैनसुख संचेती यांनी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद नियुक्तीच्या तब्बल वर्षभरानंतर स्वीकारले. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, या अपेक्षेने अध्यक्षपद स्वीकारले नव्हते. याबाबत आ. संचेती यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘मी सर्वात ज्येष्ठ आमदार असल्यामुळे मला अध्यक्षपद देण्यात आले आहे. यात कुठलीही नाराजी नाही. मी तेव्हाही नाराज नव्हतो आणि आताही नाही आणि कधी राहणारही नाही. मंडळाच्या माध्यमातून विदर्भाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. काही जबाबदाऱ्या असल्यामुळे पद स्वीकारता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कमतरतामंडळाचे अध्यक्ष आ. संचेती यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्येची प्रकरणे कमी होत आहेत. परंतु शेतकरी आत्महत्या हा कुठल्याही सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. ही संख्या आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्महत्येचे आकडे आणि सरकारी दाव्यांमध्ये अंतर असल्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन धारण केले.नाराजी नाही, राहणारही नाहीआ. चैनसुख संचेती यांनी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद नियुक्तीच्या तब्बल वर्षभरानंतर स्वीकारले. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, या अपेक्षेने अध्यक्षपद स्वीकारले नव्हते. याबाबत आ. संचेती यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘मी सर्वात ज्येष्ठ आमदार असल्यामुळे मला अध्यक्षपद देण्यात आले आहे. यात कुठलीही नाराजी नाही. मी तेव्हाही नाराज नव्हतो आणि आताही नाही आणि कधी राहणारही नाही. मंडळाच्या माध्यमातून विदर्भाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. काही जबाबदाऱ्या असल्यामुळे पद स्वीकारता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कमतरतामंडळाचे अध्यक्ष आ. संचेती यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्येची प्रकरणे कमी होत आहेत. परंतु शेतकरी आत्महत्या हा कुठल्याही सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. ही संख्या आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्महत्येचे आकडे आणि सरकारी दाव्यांमध्ये अंतर असल्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन धारण केले.

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळChainsukh Sanchetiचैनसुख संचेती