शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राममंदिर निर्मितीसाठी विहिंप करणार जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:36 IST

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असे विहिंपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असे विहिंपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.विहिंपच्या नागपूर कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल, प्रांत मंत्री अजय निल्दावार यांनी ही माहिती दिली. ४ व ५ आॅक्टोबर रोजी विहिंपच्या उच्चाधिकार समितीची दिल्ली येथे बैठक झाली. त्यात देशातील संत उपस्थित होते. जर रामजन्मभूमीसंदर्भात न्यायालयाचा निर्णय लवकर आला नाही तर संसदेत कायदा करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा. जर संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा झाला नाही तर विहिंपतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल. वेळ पडली तर केंद्राने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवावे, अशी भूमिका विहिंपतर्फे स्पष्ट करण्यात आली. दोन महिन्यांअगोदर संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमवेतदेखील समन्वय बैठक झाली. यातदेखील या मुद्यावर चर्चा झाली. लवकरच राममंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास आम्हाला आहे, असे निल्दावार यांनी सांगितले.तोगडियांच्या आंदोलनाचे स्वागतचआंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी विहिंपमधून राजीनामा दिल्यानंतर विदर्भ प्रांतात काही फरक पडलेला नाही. सर्व पदाधिकारी विहिंपमध्येच आहेत. राममंदिरासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचे आम्ही स्वागतच करतो. शेवटी आमचे विचार एकच आहेत. त्यांच्याशी आमचे स्नेहाचेच संबंध आहेत, असे निवल व निल्दावार यांनी सांगितले.खासदारांच्या भेटी घेणारअयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील सर्व खासदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. सोबतच संसदीय मुख्यालय केंद्रांवर संकल्प सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती अजय निल्दावार यांनी दिली.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याagitationआंदोलन