शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर निर्मितीसाठी विहिंप करणार जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:36 IST

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असे विहिंपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असे विहिंपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.विहिंपच्या नागपूर कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल, प्रांत मंत्री अजय निल्दावार यांनी ही माहिती दिली. ४ व ५ आॅक्टोबर रोजी विहिंपच्या उच्चाधिकार समितीची दिल्ली येथे बैठक झाली. त्यात देशातील संत उपस्थित होते. जर रामजन्मभूमीसंदर्भात न्यायालयाचा निर्णय लवकर आला नाही तर संसदेत कायदा करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा. जर संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा झाला नाही तर विहिंपतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल. वेळ पडली तर केंद्राने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवावे, अशी भूमिका विहिंपतर्फे स्पष्ट करण्यात आली. दोन महिन्यांअगोदर संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमवेतदेखील समन्वय बैठक झाली. यातदेखील या मुद्यावर चर्चा झाली. लवकरच राममंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास आम्हाला आहे, असे निल्दावार यांनी सांगितले.तोगडियांच्या आंदोलनाचे स्वागतचआंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी विहिंपमधून राजीनामा दिल्यानंतर विदर्भ प्रांतात काही फरक पडलेला नाही. सर्व पदाधिकारी विहिंपमध्येच आहेत. राममंदिरासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचे आम्ही स्वागतच करतो. शेवटी आमचे विचार एकच आहेत. त्यांच्याशी आमचे स्नेहाचेच संबंध आहेत, असे निवल व निल्दावार यांनी सांगितले.खासदारांच्या भेटी घेणारअयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील सर्व खासदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. सोबतच संसदीय मुख्यालय केंद्रांवर संकल्प सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती अजय निल्दावार यांनी दिली.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याagitationआंदोलन