शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरी रिकामी हतबल पदाधिकारी

By admin | Updated: April 17, 2017 01:59 IST

विकासाच्या अजेंड्यावर भाजपाने महापालिक ा निवडणूक लढविली. मतदारांनीही यावर विश्वास दर्शवून

गणेश हुड  नागपूर विकासाच्या अजेंड्यावर भाजपाने महापालिक ा निवडणूक लढविली. मतदारांनीही यावर विश्वास दर्शवून सलग तिसऱ्यांदा विक्रमी कौल दिला. दिलेल्या आश्वासनानुसार नवीन पदाधिकारी शहराचा चौफेर विकास करतील, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु पदभार स्वीकारताच पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या खाली तिजोरीचा साक्षात्कार झाला आहे. यावर त्यांनी हतबलता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी कशी होणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. वास्तविक गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे तिजोरी खाली असल्याचे कारण सांगण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांना नाही. एकीकडे शहर विकासाचा दावा करायचा आणि त्याचवेळी तिजोरी खाली असल्याचे कारण वक्तव्य शहरातील नागरिकाना पटण्यासारखे नाही. सलग १० वर्षे सत्ता असल्याने खाली तिजोरीची नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच आहे. तेच हतबल असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात स्वत:चा वाटा जेमतेम २९ टक्के असून शासन अनुदानाचा ७१ टक्के वाटा आहे. म्हणजेच महापालिकेचा कारभार हा शासन अनुदानावर सुरू आहे. वास्तविक गेल्या १० वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज होती. परंतु निवडणुका डोळ्यापुढे ठेवून कारभार केल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या वर्षात एलबीटीपासून ७३५ कोटी अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मार्चअखेरीस ४५० क ोटी महापालिके च्या तिजोरी जमा झाले. मालमत्ता करापासुन ३०६.४५ कोटी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८६ कोटी जमा झाले. पाणीपट्टीतून १५० कोटींऐवजी १३६ कोटी तर नगर रचना विभागाकडून १०१.८५ कोटींचा महसूल अपेक्षित असताना जेमतेम ५३ कोटी जमा झाले. अन्य विभागांचीही अशीच स्थिती आहे. म्हणजेच महापालिकेला विविध विभागाकडून अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत जवळपास ५४० कोटींची तूट आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी २०१६-१७ या वर्षाचा २०४०.४२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात महापालिके च्या तिजोरीत १५०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. जवळपास ५४० कोटींची तूट आहे. आयुक्तांनी १६३६. ३३ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला होता. यात जवळपास १३३ कोटींची तूट आहे. शासनाकडून अपेक्षित एलबीटी अनुदान न मिळाल्याने ही तूट निर्माण झाल्याचा प्रशसानाचा दावा आहे. परंतु मालमत्ता, नगररचना, पाणीपट्टी व बाजारर यापासूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. वास्तविक मालमत्ता व नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली असती. परंतु निवडणुकीच्या वर्षात वाढीवर देयके मालमत्ताधारकांना पाठविली तर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता विचारात घेता वाढीव दराने कर वसुली पुढे ढकलण्यात आली होती. याचाही महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला.