शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

तिजोरी रिकामी हतबल पदाधिकारी

By admin | Updated: April 17, 2017 01:59 IST

विकासाच्या अजेंड्यावर भाजपाने महापालिक ा निवडणूक लढविली. मतदारांनीही यावर विश्वास दर्शवून

गणेश हुड  नागपूर विकासाच्या अजेंड्यावर भाजपाने महापालिक ा निवडणूक लढविली. मतदारांनीही यावर विश्वास दर्शवून सलग तिसऱ्यांदा विक्रमी कौल दिला. दिलेल्या आश्वासनानुसार नवीन पदाधिकारी शहराचा चौफेर विकास करतील, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु पदभार स्वीकारताच पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या खाली तिजोरीचा साक्षात्कार झाला आहे. यावर त्यांनी हतबलता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी कशी होणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. वास्तविक गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे तिजोरी खाली असल्याचे कारण सांगण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांना नाही. एकीकडे शहर विकासाचा दावा करायचा आणि त्याचवेळी तिजोरी खाली असल्याचे कारण वक्तव्य शहरातील नागरिकाना पटण्यासारखे नाही. सलग १० वर्षे सत्ता असल्याने खाली तिजोरीची नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच आहे. तेच हतबल असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात स्वत:चा वाटा जेमतेम २९ टक्के असून शासन अनुदानाचा ७१ टक्के वाटा आहे. म्हणजेच महापालिकेचा कारभार हा शासन अनुदानावर सुरू आहे. वास्तविक गेल्या १० वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज होती. परंतु निवडणुका डोळ्यापुढे ठेवून कारभार केल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या वर्षात एलबीटीपासून ७३५ कोटी अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मार्चअखेरीस ४५० क ोटी महापालिके च्या तिजोरी जमा झाले. मालमत्ता करापासुन ३०६.४५ कोटी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८६ कोटी जमा झाले. पाणीपट्टीतून १५० कोटींऐवजी १३६ कोटी तर नगर रचना विभागाकडून १०१.८५ कोटींचा महसूल अपेक्षित असताना जेमतेम ५३ कोटी जमा झाले. अन्य विभागांचीही अशीच स्थिती आहे. म्हणजेच महापालिकेला विविध विभागाकडून अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत जवळपास ५४० कोटींची तूट आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी २०१६-१७ या वर्षाचा २०४०.४२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात महापालिके च्या तिजोरीत १५०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. जवळपास ५४० कोटींची तूट आहे. आयुक्तांनी १६३६. ३३ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला होता. यात जवळपास १३३ कोटींची तूट आहे. शासनाकडून अपेक्षित एलबीटी अनुदान न मिळाल्याने ही तूट निर्माण झाल्याचा प्रशसानाचा दावा आहे. परंतु मालमत्ता, नगररचना, पाणीपट्टी व बाजारर यापासूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. वास्तविक मालमत्ता व नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली असती. परंतु निवडणुकीच्या वर्षात वाढीवर देयके मालमत्ताधारकांना पाठविली तर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता विचारात घेता वाढीव दराने कर वसुली पुढे ढकलण्यात आली होती. याचाही महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला.