शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

सरकारद्वारे सादर दीड हजार पानांच्या प्रतिज्ञापत्राची पडताळणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:08 IST

नागपूर : ३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दीड हजार ...

नागपूर : ३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दीड हजार पानाच्या प्रतिज्ञापत्रामधील माहितीची सत्यता पडताळून येत्या दोन आठवड्यामध्ये मुद्देसूद प्रत्युत्तर सादर करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांना केली.

यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून अ‍ॅड. वहाणे त्या याचिकेचे कामकाज पाहत आहेत. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सरकारने योजनेचे काम कायदेशीररीत्या केले जात असल्याचे सांगून भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. त्याच्या प्रत्युत्तरात ॲड. वहाणे यांनी याचिकेचे जोरदार समर्थन करून सरकारच्या प्रतिज्ञापत्रातूनच भ्रष्टाचाराचे पुरावे मिळतील, असा दावा केला. प्रकल्पासाठी पश्चिम बंगाल येथील मे. जय बालाजी इंडस्ट्रीजकडून पाईप खरेदी करण्यात आले आहेत. त्यांना सात वेगवेगळ्या तारखांना एकूण २३ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती सरकारने प्रतिज्ञापत्रात दिली आहे. परंतु, त्या रकमांची बेरीज केल्यास एकूण रक्कम २८ कोटी रुपयांवर जाते याकडे ॲड. वहाणे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. परिणामी, न्यायालयाने वरीलप्रमाणे सूचना केली.

-----------

असे आहेत याचिकेतील आरोप

नाशिक येथील मे. पी. एल. अडके यांना या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदार व सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमत करून योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आहेत. पाणी सोडल्यानंतर निर्माण होणाऱ्या दबावामुळे पाईप फुटून आजूबाजूच्या शेतपिकाचे नुकसान होत आहे. योजनेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे, असे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.