शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:20 IST

शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.

ठळक मुद्देचालकांशी दादागिरी कशाला : रस्त्यावर अतिक्रमण, लोक वाहने ठेवणार कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.शहरातील बाजारपेठांमधील रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. काही बाजारपेठ परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. पण दोन-पाच मिनिटांच्या कामासाठी दुचाकीस्वाराला १० रुपये देणे परवडणारे नाही. रस्त्यालगत असलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर वाहन पार्क केले जाते. वाहतूक पोलीस विभागाने महसूल गोळा करण्याच्या नावाखाली शहरातील वाहने उचलण्याची मोहीमच राबविली आहे. शहरातील मीठानिम, एमआयडीसी, इंदोरा, दोसरभवन, अजनी या वाहतूक विभागातील पथकाकडून दररोज शेकडो वाहने उचलली जातात. बरेचदा वाहने उचलताना वाहन चालकांशी उचलणाऱ्या मजुरांच्या खटापटीही उडतात. दुचाकी चालकासोबत दादागिरी करण्यात येते. या सर्व प्रकाराला वाहतूक पोलिसांची मूकसंमती असते. गाडी उचलताना नागरिकांशी झालेल्या झटापटीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. मुळात वाहने उचलण्यासंदर्भातसुद्धा काही नियम आहेत. पण या नियमांचे पालन वाहतूक पोलीस स्वत:च करताना दिसत नाही. वाहन उचलण्यापूर्वीसार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास वाहने उचलावी.वाहने उचलण्यापूर्वी पोलिसांकडून स्पीकरवर दोन वेळा सूचना देणे गरजेचे आहे.उचललेल्या वाहनाच्या जागेवर खडूने गोल करून, त्यावर चौफुली मारावी.उचललेल्या गाडीचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. परंतु गाडीचे नुकसान झाल्यास कुणीही जबाबदारी घेत नाही. वाहने उचलणाऱ्याची चारित्र्य पडताळणी नाहीवाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्याचा वर्षभराचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. हा ठेकेदार २५० ते ३०० रुपये रोजीवर वाहतूक विभागाला माणसे पुरवितो. परंतु या माणसांची चारित्र्य पडताळणी केली जात नाही. या माणसांना दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक वाहने उचलल्यास ठेकेदाराकडूनत्यांना बक्षीसही दिले जात असल्याची माहिती आहे. हे बक्षीस मिळविण्याच्या उद्देशातून वाहनाची उचलेगिरी करणारी ही माणसे नियमांचेही पालन करीत नाही. उलट दादागिरीवर उतरतात. वाहनांच्या डिक्कीतील साहित्याची जबाबदारी कुणाची ?वाहतूक पोलिसांनी उचलून नेलेल्या गाडीच्या डिक्कीतील साहित्य हरविल्याचे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. महिलांच्या दुचाकी वाहनातील डिक्कीत तर अनेक मौल्यवान वस्तू असतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार हे उचलेगिरी करणारे टपूनच असतात. वाहतूक पोलीस मात्र याची जबाबदारी घेत नाही.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस