शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

नागपुरात  भाजी आता 'फार्म टू होम' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:39 IST

कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : ५० शेतकरी गटांचा केला समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजीबाजारातील गर्दी ही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदु:खी ठरली आहे. मुख्य बाजारपेठेचे विलगीकरण करूनसुद्धा बाजारातील गर्दी कमी होताना दिसत नाही. यावर पर्याय म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न होत आहे. सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. पण भाजीबाजारात होत असलेल्या गर्दीमुळे त्याचा फज्जा उडताना दिसतो आहे. भाजीबाजारांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मनपा आयुक्तांनी शहरातील मध्यवर्ती कॉटन मार्के ट बाजार बंद केला. यानंतर शहरातील विविध नऊ झोनमध्ये मोकळ्या मैदानात भाजीबाजार भरविला. मात्र, याही ठिकाणी नागरिकांकडून गर्दी झाली. भाजीबाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले मात्र, त्यावर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. भाजीबाजारात होणारी गर्दी लक्षात घेता कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ‘फार्म टू होम’ची संकल्पना राबविण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे व कृषी उपसंचालक उपरीकर यांच्या नेतृत्वात शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गटांशी चर्चा करण्यात आली. ५० गटांनी यासाठी होकार दर्शविला. यानंतर गत २७ मार्चपासून या शेतकरी गटांनी शहरातील मनपाच्या दहाही झोनमधील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या घरी शेतातील ताजा भाजीपाला/फळे, फिरते भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला.कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आज हे फिरते भाजीपाला विक्री केंद्र शहरवासीयांना ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ (फार्म टू होम) या तत्त्वावर उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी/योग्य भावाने त्यांच्या घरापर्यंंत ताजा भाजीपाला व फळे मिळत आहेत. गर्दी टाळा एवढीच अपेक्षाघराबाहेर पडून शहरात गर्दीच्या ठिकाणांहून भाजीपाला घेण्याऐवजी आपल्या वस्त्यांमध्ये येऊन भाजीची विक्री करणाऱ्या शेतकरी गटांकडून भाजीपाला विकत घ्यावा व बाहेर होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे यांनी केले आहे.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेतीnagpurनागपूर