शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नागपुरात  भाजी आता 'फार्म टू होम' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:39 IST

कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : ५० शेतकरी गटांचा केला समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजीबाजारातील गर्दी ही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदु:खी ठरली आहे. मुख्य बाजारपेठेचे विलगीकरण करूनसुद्धा बाजारातील गर्दी कमी होताना दिसत नाही. यावर पर्याय म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न होत आहे. सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. पण भाजीबाजारात होत असलेल्या गर्दीमुळे त्याचा फज्जा उडताना दिसतो आहे. भाजीबाजारांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मनपा आयुक्तांनी शहरातील मध्यवर्ती कॉटन मार्के ट बाजार बंद केला. यानंतर शहरातील विविध नऊ झोनमध्ये मोकळ्या मैदानात भाजीबाजार भरविला. मात्र, याही ठिकाणी नागरिकांकडून गर्दी झाली. भाजीबाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले मात्र, त्यावर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. भाजीबाजारात होणारी गर्दी लक्षात घेता कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ‘फार्म टू होम’ची संकल्पना राबविण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे व कृषी उपसंचालक उपरीकर यांच्या नेतृत्वात शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गटांशी चर्चा करण्यात आली. ५० गटांनी यासाठी होकार दर्शविला. यानंतर गत २७ मार्चपासून या शेतकरी गटांनी शहरातील मनपाच्या दहाही झोनमधील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या घरी शेतातील ताजा भाजीपाला/फळे, फिरते भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला.कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आज हे फिरते भाजीपाला विक्री केंद्र शहरवासीयांना ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ (फार्म टू होम) या तत्त्वावर उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी/योग्य भावाने त्यांच्या घरापर्यंंत ताजा भाजीपाला व फळे मिळत आहेत. गर्दी टाळा एवढीच अपेक्षाघराबाहेर पडून शहरात गर्दीच्या ठिकाणांहून भाजीपाला घेण्याऐवजी आपल्या वस्त्यांमध्ये येऊन भाजीची विक्री करणाऱ्या शेतकरी गटांकडून भाजीपाला विकत घ्यावा व बाहेर होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे यांनी केले आहे.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेतीnagpurनागपूर