शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बदलते रूप : मेळघाटातील बांबूपासून सव्वा लाख राख्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:38 IST

एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.

ठळक मुद्देरोजगारातून सन्मानासाठी बांबू केंद्राचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.देशपांडे म्हणाले, मेळघाटात ३१७ गावे आहेत. तीन लाख लोकसंख्येमध्ये एक लाख ८० हजार तरुण आहेत. 

मेळघाटच्या या युवा सामर्थ्यांचा उपयोग सकारात्मक कार्यात झाला तर काय साध्य होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे बांबूपासून तयार झालेल्या राख्या आहेत. मेळघाटात फक्त कुपोषणच नाही. येथे दरवर्षी सहा हजार बालके जन्मास येतात. पण कुपोषणाचे शिकार होणारे फक्त ४०० असतात. उर्वारित ५,४०० बालके याच वातावरणात जगतात, तेच अन्न खातात, तरीही सक्षमपणे जगतात हे देखील लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.रोजगारनिर्मितीसाठी बांबूपासून राख्या निर्मितीच्या  प्रयोगाबद्दल ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून या राख्या तयार होत आहेत. यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री प्रकल्पाच्या माध्यमातून मेळघाटच्या जंगलात पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमाने ४० देशात ही राखी पोहचली आहे. मागील वर्षी मेळघाटातील महिलांनी पंतप्रधानांच्या हातावर या राख्या बांधल्या होत्या.बांबू धोरण सकारात्मक करण्यात मेळघाटचा मोठा वाटा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. २०१७ मध्ये राज्य सरकारने बांबू धोरण तयार केले. १९२७ चा वनकायदा बदलला. त्याचा सकारात्मक परिणाम येथे दिसत आहे. मेळघाट आपले रूप बदलत असून, हागणदारीमुक्त गावासोबत बाथरूमयुक्त गाव ही संकल्पना चित्री या गावात साकारली आहे. आसाम, झारखंड या राज्यांसह पनवेल, किनवट, नागपूर या क्षेत्रातही कार्य सुरू झाले आहे. मेळघाटातील खामदा, किनीखेडा, कुंड, खोपमार, राक्षा ही पाच गावे सोलरयुक्त झाली आहेत. यामुळे मेळघाटची ओळख यापुढे सन्मानजनक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळघाटला कॉमन फॅसिलिटी सेंटरची नव्हे तर डिझाईन्स स्टुडिओंची जागोजागी गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे अनिल गाडेकर, संपूर्ण बांबू केंद्राचे सचिव सतीश घाणेकर, चंदा कनोजे, अनिता सेलूकर उपस्थित होते.बांबू केंद्राने परिवर्तन घडविले : चंदा कनोजेआपल्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात बांबू केंद्राने परिवर्तन घडविल्याचे मनोगत चंदा कनोजे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आम्ही भीलाला समाजातील. मुलगी म्हणून जगताना समाजाची बंधने अनेक. तरीही दहावी नापास असतानाही केंद्राने सन्मानाचे काम दिले. आईवडिलांनी परवानगी दिली. आज संगणक चालविते, टॅलीचे काम करते, एवढेच नाही तर प्रकल्पाच्या कामासाठी विमान, रेल्वेने प्रवास करते. पंतप्रधानांच्या हातावर राखी बांधण्याचे सौभाग्यही आपणास मिळाले. आयुष्यातील हे परिवर्तन संपूर्ण बांबू केंद्रामुळे घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MelghatमेळघाटRakhiराखीMediaमाध्यमे