शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस; वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 07:00 IST

Nagpur News ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे.

ठळक मुद्देअ. भा. वऱ्हाडी मंचची चळवळ चाैथ्या वर्षात

गणेश खवसे

नागपूर : कावून, गा... जास्त येलून राह्यला... लयच आंगात आली तुह्या तं... बैताड बेलनंच हाय... जास्तच कल्लाच करून राह्यला... हे शब्द विदर्भातील जिल्ह्यांनाच नव्हे तर त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन नाहीत. मात्र हे शब्द आता हळूहळू लयास जात आहे. एवढेच काय तर वऱ्हाडी बाेलीच नामशेष हाेण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त या मंचतर्फे दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे. त्यांचे औंदा (यंदा)चे हे चाैथे वर्ष आहे.

प्रत्येक भाषेचे माहात्म्य वेगळे आहे. त्याची लय, चाल आणि भाषिक साैंदर्यही वेगळेच आहे. वऱ्हाडीलाही असेच कंगाेरे लाभले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचे वारे गावातही शिरल्याने विदर्भातील गावागावात बाेलली जाणारी वऱ्हाडी आता लयास जाते की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे भाषा संवर्धनाची माेहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने अख्ख्या विदर्भातच लाेकचळवळ राबविण्यास सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘वऱ्हाड धन’ नावाचे माेबाइल ॲपही तयार केले असून त्यात १० हजार शब्दांचा साठा करून ठेवला आहे. त्यात पुन्हा संशाेधन करून शब्दसाठा वाढविला जात आहे. वऱ्हाडी बाेली विशेष: गाेंदिया, गडचिराेलीपासून, वाशिम, बुलडाण्यापर्यंतच्या गावागावात बाेलली जाते. परंतु गाेंदियाची वऱ्हाडी वेगळी, नागपूरची वऱ्हाडी वेगळी, अमरावतीची आणि अकाेल्याची वऱ्हाडी वेगळी, असा किंचित फरक त्यामध्ये दिसून येताे.

असे राबविले जातात उपक्रम

- मासिक, दिवाळी अंक पूर्णत: वऱ्हाडी भाषेत प्रकाशित केला जाताे.

- वऱ्हाडी लेखन कार्यशाळा घेणे

- ऑनलाइन माेफत वर्ग घेणे

- दिनदर्शिकाही पूर्णपणे वऱ्हाडीमध्ये प्रकाशित करणे

- निबंध स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा घेणे

- वऱ्हाडी साहित्य संमेलन घेणे

वऱ्हाडीचा महिमा लय माेठा हाय. तेच्यानं हे वऱ्हाडी खत्तम व्हू नये, असे आमाले वाटते. मनून आमी वऱ्हाडीले वाचवण्यासाठी एक चळवळ मनून भाषा साैंवर्धनाचं काम हाती घेतलं हाये. येच्या माध्यमातून वऱ्हाडी जिवंत राहावी, हेच आमची विच्छा हाय.

- आबासाहेब कडू, सल्लागार, अखिल भारतीय वऱ्हाडी मंच

टॅग्स :cultureसांस्कृतिक