शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस; वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 07:00 IST

Nagpur News ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे.

ठळक मुद्देअ. भा. वऱ्हाडी मंचची चळवळ चाैथ्या वर्षात

गणेश खवसे

नागपूर : कावून, गा... जास्त येलून राह्यला... लयच आंगात आली तुह्या तं... बैताड बेलनंच हाय... जास्तच कल्लाच करून राह्यला... हे शब्द विदर्भातील जिल्ह्यांनाच नव्हे तर त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन नाहीत. मात्र हे शब्द आता हळूहळू लयास जात आहे. एवढेच काय तर वऱ्हाडी बाेलीच नामशेष हाेण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त या मंचतर्फे दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे. त्यांचे औंदा (यंदा)चे हे चाैथे वर्ष आहे.

प्रत्येक भाषेचे माहात्म्य वेगळे आहे. त्याची लय, चाल आणि भाषिक साैंदर्यही वेगळेच आहे. वऱ्हाडीलाही असेच कंगाेरे लाभले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचे वारे गावातही शिरल्याने विदर्भातील गावागावात बाेलली जाणारी वऱ्हाडी आता लयास जाते की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे भाषा संवर्धनाची माेहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने अख्ख्या विदर्भातच लाेकचळवळ राबविण्यास सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘वऱ्हाड धन’ नावाचे माेबाइल ॲपही तयार केले असून त्यात १० हजार शब्दांचा साठा करून ठेवला आहे. त्यात पुन्हा संशाेधन करून शब्दसाठा वाढविला जात आहे. वऱ्हाडी बाेली विशेष: गाेंदिया, गडचिराेलीपासून, वाशिम, बुलडाण्यापर्यंतच्या गावागावात बाेलली जाते. परंतु गाेंदियाची वऱ्हाडी वेगळी, नागपूरची वऱ्हाडी वेगळी, अमरावतीची आणि अकाेल्याची वऱ्हाडी वेगळी, असा किंचित फरक त्यामध्ये दिसून येताे.

असे राबविले जातात उपक्रम

- मासिक, दिवाळी अंक पूर्णत: वऱ्हाडी भाषेत प्रकाशित केला जाताे.

- वऱ्हाडी लेखन कार्यशाळा घेणे

- ऑनलाइन माेफत वर्ग घेणे

- दिनदर्शिकाही पूर्णपणे वऱ्हाडीमध्ये प्रकाशित करणे

- निबंध स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा घेणे

- वऱ्हाडी साहित्य संमेलन घेणे

वऱ्हाडीचा महिमा लय माेठा हाय. तेच्यानं हे वऱ्हाडी खत्तम व्हू नये, असे आमाले वाटते. मनून आमी वऱ्हाडीले वाचवण्यासाठी एक चळवळ मनून भाषा साैंवर्धनाचं काम हाती घेतलं हाये. येच्या माध्यमातून वऱ्हाडी जिवंत राहावी, हेच आमची विच्छा हाय.

- आबासाहेब कडू, सल्लागार, अखिल भारतीय वऱ्हाडी मंच

टॅग्स :cultureसांस्कृतिक