शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस; वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 07:00 IST

Nagpur News ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे.

ठळक मुद्देअ. भा. वऱ्हाडी मंचची चळवळ चाैथ्या वर्षात

गणेश खवसे

नागपूर : कावून, गा... जास्त येलून राह्यला... लयच आंगात आली तुह्या तं... बैताड बेलनंच हाय... जास्तच कल्लाच करून राह्यला... हे शब्द विदर्भातील जिल्ह्यांनाच नव्हे तर त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन नाहीत. मात्र हे शब्द आता हळूहळू लयास जात आहे. एवढेच काय तर वऱ्हाडी बाेलीच नामशेष हाेण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त या मंचतर्फे दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे. त्यांचे औंदा (यंदा)चे हे चाैथे वर्ष आहे.

प्रत्येक भाषेचे माहात्म्य वेगळे आहे. त्याची लय, चाल आणि भाषिक साैंदर्यही वेगळेच आहे. वऱ्हाडीलाही असेच कंगाेरे लाभले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचे वारे गावातही शिरल्याने विदर्भातील गावागावात बाेलली जाणारी वऱ्हाडी आता लयास जाते की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे भाषा संवर्धनाची माेहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने अख्ख्या विदर्भातच लाेकचळवळ राबविण्यास सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘वऱ्हाड धन’ नावाचे माेबाइल ॲपही तयार केले असून त्यात १० हजार शब्दांचा साठा करून ठेवला आहे. त्यात पुन्हा संशाेधन करून शब्दसाठा वाढविला जात आहे. वऱ्हाडी बाेली विशेष: गाेंदिया, गडचिराेलीपासून, वाशिम, बुलडाण्यापर्यंतच्या गावागावात बाेलली जाते. परंतु गाेंदियाची वऱ्हाडी वेगळी, नागपूरची वऱ्हाडी वेगळी, अमरावतीची आणि अकाेल्याची वऱ्हाडी वेगळी, असा किंचित फरक त्यामध्ये दिसून येताे.

असे राबविले जातात उपक्रम

- मासिक, दिवाळी अंक पूर्णत: वऱ्हाडी भाषेत प्रकाशित केला जाताे.

- वऱ्हाडी लेखन कार्यशाळा घेणे

- ऑनलाइन माेफत वर्ग घेणे

- दिनदर्शिकाही पूर्णपणे वऱ्हाडीमध्ये प्रकाशित करणे

- निबंध स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा घेणे

- वऱ्हाडी साहित्य संमेलन घेणे

वऱ्हाडीचा महिमा लय माेठा हाय. तेच्यानं हे वऱ्हाडी खत्तम व्हू नये, असे आमाले वाटते. मनून आमी वऱ्हाडीले वाचवण्यासाठी एक चळवळ मनून भाषा साैंवर्धनाचं काम हाती घेतलं हाये. येच्या माध्यमातून वऱ्हाडी जिवंत राहावी, हेच आमची विच्छा हाय.

- आबासाहेब कडू, सल्लागार, अखिल भारतीय वऱ्हाडी मंच

टॅग्स :cultureसांस्कृतिक