शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह

By नरेश डोंगरे | Updated: September 16, 2024 22:45 IST

सेवाग्राम आणि चंद्रपूरमध्ये जोरदार स्वागत

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अशा विशेष निमंत्रित प्रवाशांना घेऊन दिमाखदारपणे सफरीवर निघालेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या तीन तासांत २१२ किलोमीटरवर आणि महाराष्ट्राच्या टोकावर असलेले बल्लारशाह गाठले. येथे या ट्रेनचे जोरदार स्वागत करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांत नागपूरहून सुरू झालेली ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी नागपूर जबलपूर आणि त्यानंतर नागपूर इंदोर या दोन वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरहून सुरू करण्यात आल्या असून या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर सोमवारी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सजूनधजून उभी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मुख्य कार्यक्रमातून नागपूर सिकंदराबादसह देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविली. दरम्यान, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ.कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा, विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल तसेच अन्य गणमान्य तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी रोड, रेल्वे अन् हवाई कनेक्टीव्हिटी महत्त्वाची ठरते. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपुरात या सोयी चांगल्या आहे. आज त्यात वंदे भारतची भर पडली. आता दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ व्हावी, असे मनोगत राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. तर, नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दक्षिणेकडील राज्याशी नागपूरची कनेक्टीव्हिटी अन् विकासही अधिक वाढेल, असे मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नोंदविले.

शुभेच्छा, टाळ्या अन् ढोलताशांचा गजर

राज्यपाल राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वंदे भारतच्या लोको पायलटला शुभेच्छा देत हिरवी झेंडी दाखविली. यावेळी टाळ्या आणि ढोलताशांचा गजर झाला. दरम्यान, सिकंदराबादकडे निघालेल्या या गाडीत साडेआठशेवर विद्यार्थी आणि चारशेवर निमंत्रित प्रवासी होते. नागपूरहून ३:५५ वाजता निघाल्यानंतर सेवाग्राम (वर्धा) स्थानकावर ही गाडी थांबली. तेथून स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर तिने थेट चंद्रपूर आणि त्यानंतर रात्री ७:१५ च्या सुमारास बल्लारशाह स्थानक गाठले. तेथेही वंदे भारतचे जोरदार स्वागत करण्यात आले. नंतर, ही गाडी सिकंदराबादकडे रवाना झाली.

विद्यार्थ्यांना वंदे भारतची सफर

सोमवारी ईदनिमित्त शहरातील सर्व शाळेला सुटी होती. मात्र, वंदे भारतच्या शुभारंभाला शहरातील श्री गुरू गोविंद सिंग गड्डीगोदाम, सेंट विन्सेंट पल्लोटी स्कूल अनंतनगर यासह इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह बोलावण्यात आले होते. तसेच एनसीसीचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. रेल्वेकडून विद्यार्थ्यांना वंदे भारतचा प्रवास घडविण्यात आला. शाळेतील विद्यार्थी दुपारी २ वाजतापासून फलाटावर दाखल झाले. मात्र, कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने त्यांना ताटकळत राहावे लागले.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस