शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह

By नरेश डोंगरे | Updated: September 16, 2024 22:45 IST

सेवाग्राम आणि चंद्रपूरमध्ये जोरदार स्वागत

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अशा विशेष निमंत्रित प्रवाशांना घेऊन दिमाखदारपणे सफरीवर निघालेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या तीन तासांत २१२ किलोमीटरवर आणि महाराष्ट्राच्या टोकावर असलेले बल्लारशाह गाठले. येथे या ट्रेनचे जोरदार स्वागत करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांत नागपूरहून सुरू झालेली ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी नागपूर जबलपूर आणि त्यानंतर नागपूर इंदोर या दोन वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरहून सुरू करण्यात आल्या असून या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर सोमवारी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सजूनधजून उभी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मुख्य कार्यक्रमातून नागपूर सिकंदराबादसह देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविली. दरम्यान, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ.कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा, विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल तसेच अन्य गणमान्य तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी रोड, रेल्वे अन् हवाई कनेक्टीव्हिटी महत्त्वाची ठरते. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपुरात या सोयी चांगल्या आहे. आज त्यात वंदे भारतची भर पडली. आता दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ व्हावी, असे मनोगत राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. तर, नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दक्षिणेकडील राज्याशी नागपूरची कनेक्टीव्हिटी अन् विकासही अधिक वाढेल, असे मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नोंदविले.

शुभेच्छा, टाळ्या अन् ढोलताशांचा गजर

राज्यपाल राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वंदे भारतच्या लोको पायलटला शुभेच्छा देत हिरवी झेंडी दाखविली. यावेळी टाळ्या आणि ढोलताशांचा गजर झाला. दरम्यान, सिकंदराबादकडे निघालेल्या या गाडीत साडेआठशेवर विद्यार्थी आणि चारशेवर निमंत्रित प्रवासी होते. नागपूरहून ३:५५ वाजता निघाल्यानंतर सेवाग्राम (वर्धा) स्थानकावर ही गाडी थांबली. तेथून स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर तिने थेट चंद्रपूर आणि त्यानंतर रात्री ७:१५ च्या सुमारास बल्लारशाह स्थानक गाठले. तेथेही वंदे भारतचे जोरदार स्वागत करण्यात आले. नंतर, ही गाडी सिकंदराबादकडे रवाना झाली.

विद्यार्थ्यांना वंदे भारतची सफर

सोमवारी ईदनिमित्त शहरातील सर्व शाळेला सुटी होती. मात्र, वंदे भारतच्या शुभारंभाला शहरातील श्री गुरू गोविंद सिंग गड्डीगोदाम, सेंट विन्सेंट पल्लोटी स्कूल अनंतनगर यासह इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह बोलावण्यात आले होते. तसेच एनसीसीचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. रेल्वेकडून विद्यार्थ्यांना वंदे भारतचा प्रवास घडविण्यात आला. शाळेतील विद्यार्थी दुपारी २ वाजतापासून फलाटावर दाखल झाले. मात्र, कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने त्यांना ताटकळत राहावे लागले.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस