शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

By नरेश डोंगरे | Updated: December 11, 2022 23:43 IST

अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले.

नागपूर : वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून सकाळी ९.५४ वाजता ग्रीन सिग्नल दिला अन् महाराष्ट्र तसेच छत्तीसगडच्या दळणवळणाचा धागा घट्ट करत वायुवेगाने ती बिलासपूरकडे निघाली. मार्गात तब्बल २७ ठिकाणी हारतुरे अन् स्वागत स्वीकारण्यासाठी ती थांबली. मात्र, लगेच पुन्हा ऐट दाखवत तिने अवघ्या आठ तासात बिलासपूर गाठले.

प्रवासाची एक वेगळी अनुभूती देणाऱ्या वंदे भारत ट्रेनला रेल्वेलाइनवर चालणारे विमान म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले. तिच्या पहिल्या प्रवासाचा सोहळा ऐतिहासिकच ठरला. तिला शुभारंभाचा शगून दाखविण्यासाठी रेल्वेस्थानकावर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी खास पंतप्रधान मोदी रेल्वेस्थानकावर आले. त्यांच्यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

नवरीसारखी नटून थटून फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या ‘वंदे भारत’च्या कोचचे निरीक्षण करून पंतप्रधानांनी ऑनबोर्ड सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर कंट्रोल रूम गाठत ट्रेन संचालनाची माहिती घेतली. दरम्यान, स्टाफशी चर्चा करून मोदींनी तिला हिरवा झेंडा दाखवला अन् पुढच्या काही क्षणातच ती वाऱ्यावर स्वार झाली. ६६८ निमंत्रितांना आणि पन्नासेक पत्रकारांना घेऊन कामठी, कन्हान स्थानकांना धावती भेट देत अवघ्या तासाभरात तिने भंडारा रेल्वेस्थानक गाठले. येथे प्रवासी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, स्थानिक नेत्यांनी तिला अक्षता लावून ओवाळले. बॅण्डच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत चालकासह अन्य कर्मचाऱ्यांना मिठाई खाऊ घालण्यात आली. त्यानंतर तिरोडा, तुमसर, कोकातील दोन दोन मिनिटांचे स्वागत स्वीकारून ती दुपारी १२ च्या सुमारास गोंदिया स्थानकावर पोहचली. 

येथेही तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि मधे-मधे अनेक छोट्या स्थानकांवर अशाच प्रकारचा स्वागत सोहळा आटोपून सायंकाळी ६ च्या सुमारास ती बिलासपूरला पोहचली. येथे तिच्या स्वागताची जोरदार तयारी करून ठेवण्यात आली होती. स्थानकाला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. मोठ्या संख्येतील नागरिक, त्यांची घोषणाबाजी, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, कागदांची उधळण करणारे साैम्य स्वरूपाचे फटाके अशा प्रचंड उत्साहात वंदे भारतचा आजचा पहिला ऐतिहासिक प्रवास थांबला. सोमवारी ती पुन्हा नागपूरकडे येणार आहे.

गावोगावची मंडळी, मोहक रूपावर फिदाप्रवासाच्या दरम्यान तिला बघण्यासाठी तिचे मोहक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावरील मोठ्या स्थानकांवरच नव्हे तर विविध छोट्या गावांच्या स्थानकांवर, रेल्वे फाटकांवर मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या देहबोलीतून ते वंदे भारतच्या रूपा-गुणांवर भाळल्याचे जाणवत होते.

ठिकठिकाणी झाले ‘लाइव्ह’प्रवासादरम्यान पहिल्या डब्यापासून १६ व्या डब्यापर्यंत विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ‘लाइव्ह’ करून तिचे गुणगान करून देशातील जनेतला वैशिष्ट्य सांगत होते. नागपूर, बिलासपूरच नव्हे तर मुंबई, महाराष्ट्रासह, छत्तीसगड, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थानमधूनही विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन वंदे भारतमधील प्रवास कसा आरामदायक आहे, ते कथन करीत होते.

काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!काय त्या सीटा, काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच आहे. तिच्या दाराजवळ जाताच ते आपोआप उघडते अन् आपसूकच बंदही होते. सीटवर बसल्यानंतर ती पाहिजे त्या दिशेने (रिव्हॉल्व्हिंग) फिरविता येते. विमानाने आकाशात झेप घ्यावी, तशी ती वाऱ्यावर स्वार होऊन वायुवेगाने समोर निघते. या शिवायही तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात सांगायचे म्हटले तर काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस