शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

By नरेश डोंगरे | Updated: December 11, 2022 23:43 IST

अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले.

नागपूर : वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून सकाळी ९.५४ वाजता ग्रीन सिग्नल दिला अन् महाराष्ट्र तसेच छत्तीसगडच्या दळणवळणाचा धागा घट्ट करत वायुवेगाने ती बिलासपूरकडे निघाली. मार्गात तब्बल २७ ठिकाणी हारतुरे अन् स्वागत स्वीकारण्यासाठी ती थांबली. मात्र, लगेच पुन्हा ऐट दाखवत तिने अवघ्या आठ तासात बिलासपूर गाठले.

प्रवासाची एक वेगळी अनुभूती देणाऱ्या वंदे भारत ट्रेनला रेल्वेलाइनवर चालणारे विमान म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले. तिच्या पहिल्या प्रवासाचा सोहळा ऐतिहासिकच ठरला. तिला शुभारंभाचा शगून दाखविण्यासाठी रेल्वेस्थानकावर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी खास पंतप्रधान मोदी रेल्वेस्थानकावर आले. त्यांच्यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

नवरीसारखी नटून थटून फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या ‘वंदे भारत’च्या कोचचे निरीक्षण करून पंतप्रधानांनी ऑनबोर्ड सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर कंट्रोल रूम गाठत ट्रेन संचालनाची माहिती घेतली. दरम्यान, स्टाफशी चर्चा करून मोदींनी तिला हिरवा झेंडा दाखवला अन् पुढच्या काही क्षणातच ती वाऱ्यावर स्वार झाली. ६६८ निमंत्रितांना आणि पन्नासेक पत्रकारांना घेऊन कामठी, कन्हान स्थानकांना धावती भेट देत अवघ्या तासाभरात तिने भंडारा रेल्वेस्थानक गाठले. येथे प्रवासी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, स्थानिक नेत्यांनी तिला अक्षता लावून ओवाळले. बॅण्डच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत चालकासह अन्य कर्मचाऱ्यांना मिठाई खाऊ घालण्यात आली. त्यानंतर तिरोडा, तुमसर, कोकातील दोन दोन मिनिटांचे स्वागत स्वीकारून ती दुपारी १२ च्या सुमारास गोंदिया स्थानकावर पोहचली. 

येथेही तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि मधे-मधे अनेक छोट्या स्थानकांवर अशाच प्रकारचा स्वागत सोहळा आटोपून सायंकाळी ६ च्या सुमारास ती बिलासपूरला पोहचली. येथे तिच्या स्वागताची जोरदार तयारी करून ठेवण्यात आली होती. स्थानकाला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. मोठ्या संख्येतील नागरिक, त्यांची घोषणाबाजी, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, कागदांची उधळण करणारे साैम्य स्वरूपाचे फटाके अशा प्रचंड उत्साहात वंदे भारतचा आजचा पहिला ऐतिहासिक प्रवास थांबला. सोमवारी ती पुन्हा नागपूरकडे येणार आहे.

गावोगावची मंडळी, मोहक रूपावर फिदाप्रवासाच्या दरम्यान तिला बघण्यासाठी तिचे मोहक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावरील मोठ्या स्थानकांवरच नव्हे तर विविध छोट्या गावांच्या स्थानकांवर, रेल्वे फाटकांवर मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या देहबोलीतून ते वंदे भारतच्या रूपा-गुणांवर भाळल्याचे जाणवत होते.

ठिकठिकाणी झाले ‘लाइव्ह’प्रवासादरम्यान पहिल्या डब्यापासून १६ व्या डब्यापर्यंत विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ‘लाइव्ह’ करून तिचे गुणगान करून देशातील जनेतला वैशिष्ट्य सांगत होते. नागपूर, बिलासपूरच नव्हे तर मुंबई, महाराष्ट्रासह, छत्तीसगड, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थानमधूनही विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन वंदे भारतमधील प्रवास कसा आरामदायक आहे, ते कथन करीत होते.

काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!काय त्या सीटा, काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच आहे. तिच्या दाराजवळ जाताच ते आपोआप उघडते अन् आपसूकच बंदही होते. सीटवर बसल्यानंतर ती पाहिजे त्या दिशेने (रिव्हॉल्व्हिंग) फिरविता येते. विमानाने आकाशात झेप घ्यावी, तशी ती वाऱ्यावर स्वार होऊन वायुवेगाने समोर निघते. या शिवायही तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात सांगायचे म्हटले तर काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस