शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडी ‘अपयशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:10 IST

गेल्या वर्षभरात आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात ४० लाखावर मते घेत तिसरा पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले असले तरी नागपुरात मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. नागपूरचे उमेदवार सागर डबरासे यांनी २६ हजार मते घेतली मात्र आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात ही मते पुरेशी नाहीत, असेच म्हणावी लागेल.

ठळक मुद्देआंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्याकडे मतदारांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या वर्षभरात आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात ४० लाखावर मते घेत तिसरा पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले असले तरी नागपुरात मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. नागपूरचे उमेदवार सागर डबरासे यांनी २६ हजार मते घेतली मात्र आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात ही मते पुरेशी नाहीत, असेच म्हणावी लागेल.लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांना संपूर्ण राज्यात मिळालेला प्रतिसाद बघता वंचित आघाडी ही राज्यात तिसरा पर्याय म्हणून पुढे येऊ शकेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. झालेही तसेच. औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार निवडून आला. आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला असला तरी, वंचितच्या उमेदवारांनी भरभरून मते घेतली. अनेक उमेदवारांनी लाखांवर मते घेतली. त्यामुळे राज्यात वंचित बहुजन आघाडीने आपला एक दबदबा निर्माण केला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु नागपुरात मात्र आघाडीला पाहिजे तसे यश मिळवता आले नाही. आंबेडकरी चळवळीचे गड समजल्या जाणाऱ्या नागपुरात वंचित बहुजन आघाडीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. सोबत एमआयएम असल्याने मुस्लीम समाजाचेही पाठबळ मोठ्या प्रमाणावर मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे नागपुरात वंचितचा उमेदवार किती मते घेणार? याकडे लोकांचे लक्ष होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे यांनी २६,१२८ मते घेतली. ही मते बऱ्यापैकी आहेत, असे काही जण मानतात. परंतु मागील काही वर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील विद्यार्थी व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जुळला. आंबेडकरी चळवळीचा गड असलेल्या नागपूर शहरातील तरुणांचाही यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.नागपुरात इंदोरा मैदान येथे त्यांच्या सभेला मिळलेला प्रतिसाद पाहता वंचित बहुजन आघाडी नागपुरात बऱ्यापैकी मते घेईल असे म्हटले जात होते. परंतु तसे झाले नाही. तगड्या उमेदवाराच्या शोधासाठी उमेदवार जाहीर होण्यास झालेला विलंब हे सुद्धा त्याचे एक कारण मानले जाते. एकूणच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली परंतु अपेक्षित यश मिळू शकले नाही.नागपूरपेक्षा रामटेकमध्ये चांगली मतेनागपूरच्या तुलनेत रामटेकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार किरण पाटणकर यांनी ३६ ,३४० मते घेऊन वंचितची ताकद दाखवली खरी. परंतु याच किरणताई जेव्हा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. तेव्हा त्यांनी ९५ हजारावर मते घेतली होती. त्या तुलनेत ती कमी असली तरी पाटणकर यांची सामाजिक बंधिलकी आणि नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीेची ही ताकद म्हणावी लागेल.विधानसभेत ठरणार निर्णायकवंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी राज्यात ४० लाखावर मते घेतली आहेत. अनेक उमेदवारांनी लाखावर मते घेतली. अनेक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाांवर राहिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चिंता निश्चितच वाढली आहे. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही महत्त्वाची राहील, नव्हे तर निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेकVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी