शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मार्चनंतरच धावू शकेल बालोद्यानची वनबाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 21:14 IST

Vanbala, nagpur news प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात हाेईल व मार्चनंतरच वनबाला पुन्हा धावू लागेल, अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देट्रॅक दुरुस्तीचा प्रस्ताव डीपीडीसी मंजुरीच्या प्रतीक्षेत

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : काेराेनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनमुळे बंद पडलेले सेमिनरी हिल्सस्थित बालाेद्यानची ओळख असलेल्या वनबालाची चाके अद्याप थांबलेलीच आहेत. रेल्वे ट्रॅक खराब झाल्याने व गिट्टी उखडल्याने वनबाला बंद पडली. ती पुन्हा धावायला संपूर्ण ट्रॅक दुरुस्त करावी लागणार आहे. वन विभागाने ट्रॅक दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा नियाेजन समितीकडे (डीपीडीसी) प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात हाेईल व मार्चनंतरच वनबाला पुन्हा धावू लागेल, अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

लाॅकडाऊनमध्ये वनबालाच्या रेल्वे रुळाचे लाकडी स्लीपर खराब झाले आहेत. याशिवाय रुळावरील गिट्टी उखडली आहे. त्यामुळे दगडांनी दबलेले रुळ समतल करण्याचेही काम आवश्यक आहे; मात्र लाॅकडाऊन संपून इतके महिने लाेटले असतानाही वन विभागाने हे काम केले नाही. या काळात सेमिनरी हिल्सच्या सुरक्षा भिंतीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले; पण वनबालाच्या रुळाकडे पाठ फिरविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे अनलाॅकनंतर प्रशासनाच्या परवानगीने बालाेद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. नागरिकही कुटुंबासह येथे पाेहोचत आहेत; मात्र वनबाला धावत नसल्याने मुलांची निराशा हाेत आहे. त्यांना निराश हाेऊन परतावे लागते. वनबाला नेहमी बंद राहत असल्याची तक्रार नेहमीचीच झाली आहे.

१८ ते २० लाखाचा खर्च

रेल्वे रुळाच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी जवळपास १८ ते २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रक्कम अधिक असल्याने वन विभागाने हा प्रस्ताव डीपीडीसीकडे सादर केला. डीपीडीसीने मंजुरी दिल्यास लवकर काम सुरू हाेईल. तांत्रिक काम असल्याने रेल्वे विभाग आणि वन विभागाच्या अभियंत्यांच्या समन्वयातून हे काम हाेईल. मार्चनंतरच वनबाला सुरू हाेण्याची अपेक्षा विभागाचे अधिकारी प्रभुनाथ शुक्ल यांनी व्यक्त केली.

४२ वर्षांपासून मुलांसाठी आनंददायी

बालाेद्यानमध्ये ३ किलाेमीटरच्या राउंड ट्रॅकवर ही वनबाला धावत असते. डिसेंबर १९७८ साली तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वनबालाचे उद्‌घाटन केले हाेते. तेव्हापासून ही टाॅयट्रेन बच्चे कंपनीसाठी आनंददायी ठरली आहे; मात्र उदासीनतेमुळे ती अनेकदा बंद पडत असते. ताे आनंद कायम राहावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Balodyanबालोद्यानnagpurनागपूर