शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

‘वलनी एक्सप्रेस’ धावली, पण...

By admin | Updated: March 27, 2015 02:03 IST

क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत भारतीय संघ सिडनी येथे सामना खेळत असताना उपराजधानीतदेखील दिवसभर क्रिकेटचाच माहौल होता.

नागपूर : क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत भारतीय संघ सिडनी येथे सामना खेळत असताना उपराजधानीतदेखील दिवसभर क्रिकेटचाच माहौल होता. संपूर्ण विश्वचषकात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या ‘टीम इंडिया’चा पराभव क्रिकेटप्रेमींना चटका लावून गेला. ‘वलनी एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेश यादवने चार बळी मिळवत दाखविलेला लढाऊ बाणा भारताला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही याची हळहळ नागपूरकरांनी व्यक्त केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर नागरिकांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता याच सामन्याची पहायला मिळाली. अनेकांनी तर कार्यालयातून सुटी काढली होती तर काहींनी दांडी मारली. महाविद्यालयांतदेखील अशीच स्थिती होती. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच होती. एरवी सकाळी न उठणारे महाभागदेखील सर्व आवरून ७.३० पासूनच दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. सामना सुरू होण्याच्या अगोदर शहरातील काही मंदिरात चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली. भारताच्या गोलंदाजांवर कांगारुंनी आक्रमण सुरू केल्यानंतर क्रिकेटचाहत्यांचे ‘बीपी’ वाढण्यास सुरुवात झाली होती. उमेश यादवने ४ बळी घेतले. त्यामुळे आॅस्ट्रलियाला ३५० च्या वर जाता आले नाही असे समाधान व्यक्त करण्यात येत होते. भारतीय संघाची फलंदाजीतील कामगिरी लक्षात घेता हे ३२९ च्या लक्ष्याचा पाठलाग सहज होईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले अन् नागपूरकरांची आशा मावळत गेली. (प्रतिनिधी)