शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:14 IST

अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रचारसभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रहार केलेच. परंतु भारत कुणासमोरही झुकणार नाही असा दम थेट अमेरिकेसह संपूर्ण जगालाही नागपुरातूनच दिला होता.

ठळक मुद्देअमेरिकेसह जगालाही दिला होता दम : भाषणादरम्यान अनेकदा साधला मराठीत संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रचारसभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रहार केलेच. परंतु भारत कुणासमोरही झुकणार नाही असा दम थेट अमेरिकेसह संपूर्ण जगालाही नागपुरातूनच दिला होता.२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नागपूर-कामठी लोकसभा मतदार संघातून भाजपने अटलबहादूर सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. अटलबहादूर सिंग यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी तेव्हा नागपूरला आले होते. १६ एप्रिल २००४ रोजी कस्तूरचंद पार्कवर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशी ठरली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले. भाजपाने केलेल्या कामांचे वर्णन करीत चांगल्याला चांगले म्हणण्याची हिंमत ही आजच्या काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेस अमेरिकेच्या दबावापुढे झुकली, परंतु आम्ही संधी मिळताच अणूस्फोट घडविला, असे सांगत आपण अमेरिकेपुढे झुकणार नाही, असे स्पष्ट केले.वाजपेयी यांनी भाषणामध्ये मधूनमधून मराठी शब्दांचा वापर केला. त्यांनी भाषणाची सुरुवातच ‘नागपूर आणि महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना मनापासून नमस्कार’ अशी केली. गंगेवरील कवितेसोबत आपण नेहरूंची प्रशंसा केली तर आपल्याला नेहरूवादी म्हणतात, कोण आहे नेहरूवादी? बोडखं तुमचं’ असे वाजपेयी म्हणताच हास्याची कारंजी उडाली. आपल्या सरकारमधील काही लोक गडबड करायचे, असे सांगून वाजपेयी म्हणाले होते, की त्यांना मी तुम्ही जास्त गडबड करू नका असे मराठीत संगितले की, ते ऐकत असत.भाषण संपवून जागेवर बसण्यापूर्वी वाजपेयी यांनी नागपूरचे उमेदवार अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले आणि म्हणाले ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंग ही’ वाजपेयींच्या या वाक्यावर साºयांनीच हसून दाद दिली.‘इंग्रजांना माफीनाफा’बाबत खुलासा अन् खंतअटल बिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत पकडले गेले असता इंग्रजांना माफीनामा लिहून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली होती. म्हणून ते दशभक्त नसून देशद्रोही आहेत, असा आरोप नेहमी केला जातो. त्या काळातही हा आरोप केला गेला. त्यासंदर्भात वाजपेयी यांनी नागपूरच्याच जाहीर सभेत त्याचे उत्तर दिले होते. त्यांनी सांगितले की, ‘शालेय जीवनात आपण स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी झालो होता. पण खोल्या जाळल्याचा आरोप करून आम्हा दोन भावांना अटक करण्यात आली. त्यात आम्ही नव्हतो. हे सिद्ध झाल्यावर पोलिसांनी आम्हाला सोडले,’ असा खुलासा वाजपेयी यांनी तेव्हा केला होता. आम्ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आज आहोत. म्हणून मुद्दाम हा मुद्दा उचलला जात आहे. देशभक्त असल्याचे सिद्ध करावे लागत असेल तर देशात राहण्याचा कुठलाही आनंद नाही. माझ्या मनाला अशा आरोपांमुळे वेदना होतात. इच्छा होते की, निवडणूकच लढवू नये, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. पण आपण मैदान सोडणार नाही, असेही ठणकावून सांगितले होते.इंदिराजींना ‘दुर्गा’ म्हटले नसल्याचा खुलासाअटलबिहारी वाजपेयी यांनीच इंदिरा गांधी यांना दुर्गा अशी उपमा दिल्याचे नेहमी सांगितले जाते. आपण त्यांना दुर्गा म्हटले नसल्याचा खुलासाही खुद्द वाजपेयी यांनी याच जाहीर सभेत केला होता. त्यांनी सांगितले की, ‘बांगलादेशाच्या युद्धात केलेल्या कामगिरीनंतर इंदिराजींची प्रशंसा केली होती, पण त्यांना दुर्गा म्हटले नव्हते. दुर्गेचे रूप, तिची भव्यता आणि दुर्गेच्या पूजेचा अर्थ आपल्याला चांगला माहिती आहे. इंदिराजींना दुर्गा म्हणणारे दुसरे होते, पण पेपरवाल्यांनी हे वाक्य आपल्या नावावर छापल्याचा’ खुलासा वाजपेयींनी केला.

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीnagpurनागपूर