शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर

By admin | Updated: January 8, 2016 04:01 IST

माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून रस्ते वाहतुकीचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडविता येईल, यासाठी नागरिकांकडून सूचना तसेच अभिनव कल्पना जाणून घेतल्या जात आहे.

आयटी फॉर परिवहन अभियान : विद्यार्थ्यांच्या सूचनांवर तयार होतोय अहवालनागपूर : माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून रस्ते वाहतुकीचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडविता येईल, यासाठी नागरिकांकडून सूचना तसेच अभिनव कल्पना जाणून घेतल्या जात आहे. यासाठी आयटी फॉर परिवहनतर्फे अभियान राबविण्यात आले आहे. आयटी फॉर परिवहनची चमू सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी यासंदर्भात संवाद साधला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सूचनांवर एक अहवाल तयार केला जात असून तो शासनास सादर केला जाणार आहे.आयटी फॉर परिवहनतर्फे या दौऱ्यात नागपूरच्या अजिता डोरलीकर, जयपूरचे वीरेंद्र शर्मा, नाशिकचे नितीन शुक्ल, भंडाऱ्याचे महेंद्र निंबार्ते यांचा समावेश आहे. ही चमू आज नागपुरात आली असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत याविषयाची सविस्तर माहिती दिली. नितीन शुक्ल यांनी सांगितले की, रस्ते वाहतूक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणे ही संपूर्ण देशासमोरील एक मोठी समस्या बनली आहे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील रस्ते वाहतूक ही अधिक चांगली व सुरक्षित कशी करता येईल, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे एक आयटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. या टास्क फोर्समध्ये मोहन दास पै, विनित गोयंका यांसारख्या तज्ञांचा समावेश आहे.विनित गोयंका यांच्या नेतृत्वात आयटी फॉर परिवहन हे अभियान देशभरात राबविले जात आहे. यात अशासकीय संघटनांच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांशी संवाद साधून रस्ते वाहतुकीसंदर्भात त्यांच्या काय सूचना व कल्पना आहेत त्या समजून घेणे आणि त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळी टीम कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता पहिल्या टप्प्यात जवळपास १५ हजार नागरिकांच्या सूचना एकत्रित करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या या टीमने गेल्या तीन दिवसात भंडारा, रामटेक, गोंदिया आदी जिल्ह्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी परिसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना रस्ता वाहतुकीसंदर्भात काय वाटते याचा एक अहवाल तयार करून तो सुद्धा शासनास सादर केला जाईल. भविष्यात रस्ते वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासन जो काही धोरणात्मक निर्णय घेईल, तेव्हा या अहवालाचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास या चमूने यावेळी व्यक्त केला.(प्रतिनिधी)