शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कन्फर्म तिकिट असूनही उर्मट प्रवाशांनी दाम्पत्याला कोचबाहेर ढकलले

By नरेश डोंगरे | Updated: April 13, 2024 20:20 IST

संघमित्रा एक्सप्रेसमधील प्रकार : नागपूर स्थानकावरील घटना, प्रवाशांमध्ये संताप

नागपूर : एसीचे कन्फर्म तिकिट घेऊन कोचमध्ये चढू पाहणाऱ्या एका दाम्पत्याला उर्मट प्रवाशांनी चक्क फलाटावर लोटून दिले. त्यांचे सामानही बाहेर फेकले. विशेष म्हणजे, ज्यांची जबाबदारी होती, त्या रेल्वे प्रशासनाने हतबलता दाखवत हात वर केल्याने या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळी ही संतापजनक घटना रेल्वे स्थानकावर घडली.

मेहर बेग अशपाक बेग हे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य जाफरनगरात राहते. त्यांची मुलगी पटना (बिहार) येथे राहते. तिची प्रकृती चांगली नसल्याने व्हीआयपी कोट्यातून या दाम्पत्याने ट्रेन नंबर १२२९५ संघमित्रा एक्सप्रेसचे एसी कोचचे कन्फर्म तिकिट मिळवले. नागपूर् स्थानकावर ही गाडी येण्याची वेळ सकाळी ८.४० ची आहे. त्यानुसार, १५ मिनिटांपूर्वी बेग दाम्पत्य रेल्वे स्थानकावर पोहचले. तासभर विलंबाने ही गाडी स्थानकावर आल्यानंतर बेग दाम्पत्य आपल्या कोचमध्ये शिरले. गाडीत प्रचंड गर्दी होती. कोच नंबर एस - ४ मध्ये त्यांच्या कन्फर्म सिट (३४ व ३५) वर दुसरेच प्रवासी बसून होते. त्यांना उतरण्याची विनंती केली असता एका प्रवाशाने सीटवरून उठण्यास नकार दिला आणि या दाम्पत्यासोबत वाद घातला.

दरम्यान, डब्याच्या दोन्ही बाजुच्या दारातून आतमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांचा आटापिटा सुरू होता. सीटवर अतिक्रमण करणाऱ्या प्रवाशाने बेग यांची बॅग फलाटावर फेकली. एवढेच नव्हे तर त्याच्या सोबतच्यांनी बेग दाम्पत्यांना चक्क डब्याबाहेर काढून फलाटावर लोटून दिले. मुलगी आजारी आहे, आम्हाला अर्जंट जायचे आहे, असे हे दाम्पत्य रडून ओरडून सांगत होते. अन्य प्रवाशांनी तसेच फलाटावरील पोलिसांनी तसेच संतप्त प्रवाशांनी त्या उर्मट प्रवाशांना समजावण्याचे प्रयत्न केले. दोन दंडूकेही दिले. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. दरम्यान, संघमित्रा एक्सप्रेस फलाटावरून निघून गेली. त्यामुळे मेहर बेग यांनी रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. या अधिकाऱ्यांनी 'रुटीन जॉब'च्या अविर्भावात तक्रार नोंदवून घेतली आणि पीडित दाम्पत्याला दुसऱ्या ट्रेनने पटना येथे जाण्याचा सल्ला दिला. 

साडेआठ तासानंतर मिळाली दुसरी ट्रेन

या घटनेमुळे व्यथित झालेले बेग दाम्पत्य दिवसभर रेल्वे स्थानकावर बसून राहिले. तब्बल साडेआठ तासानंतर, सायंकाळी ५.३० वाजता त्यांना पटनाला जाण्यासाठी दुसरी ट्रेन मिळाली. बागमती एक्सप्रेसची जनरल तिकिट काढून बेग दाम्पत्य मुलीकडे जाण्यासाठी रवाना झाले.

तीन दिवसांपूर्वीच घोषणा

रेल्वेतील गर्दी अन् प्रवाशांचा जीवघेणा प्रवास या संबंधिचे वृत्त लोकमतने चार दिवसांपूर्वी प्रकाशित केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी गर्दी नियंत्रणासाठी गाडी नागपूर स्थानकावर येण्यापूर्वीच बल्लापूर स्थानकावरूनच उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी योग्यपणे केली जात नसल्याचे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

काय करतात टीसी आणि आरपीएफ ?

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबंधित महिला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून जेव्हा तिकिट कन्फर्म आहे तर दुसऱ्या प्रवाशांना तेथे कुणी बसू दिले. कोचमधील टीसी आणि आरपीएफ काय करतात, असा सवाल केला.