शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

नागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:36 IST

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.

ठळक मुद्दे कृषी सभापती म्हणतात, बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी घेऊन जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याचे सांगत कृषी अधीक्षकांना निवेदन दिले होते व खतांची काळाबाजारी होत असल्याचा आरोपही केला होता. शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटानी दरवर्षी ग्रस्त असतो. यंदा दोन्ही संकटे मानगुटीवर असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने संपूर्ण शेती पाण्यात गेली असता कपाशीसाठी गरजेचे असलेली खतेही उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर विक्रेते खतच उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. परंतु, प्रशासकीय स्तरावर ही बाब मान्य नसल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीनंतर कृषी सभापती वैद्य यांनी खताच्या तुटवड्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खापर फोडले. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार मेट्रिक टन अधिकचे खत प्राप्त झाल्याचे सांगितले. मध्य प्रदेश, वर्धा तालुक्यातील सेलू, अमरावतीचा काही भाग येथील शेतकरी नागपूर जिल्ह्यातून खते खरेदी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात खतांची उपलब्धतायुरियाबद्दल बोलताना त्यांनी सांगतले की, गेल्यावर्षी ४५ हजार मेट्रिक टन युरिया मंजूर होता. यंदा ५१ हजार १६० मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती. त्यानंतरही आतापर्यंत ५६ हजार १८९ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला. त्यात ४५ हजार ४२१ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून अद्याप १० हजार ७६८ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी २१ हजार २९० मेट्रिक टन मंजूर होते. त्यात २४ हजार ३६८ मेट्रिक टन उपलब्ध झाले. तर २२ हजार ६३२ मेट्रिक टन विक्री झाली असून १,७३६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर