शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:36 IST

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.

ठळक मुद्दे कृषी सभापती म्हणतात, बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी घेऊन जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याचे सांगत कृषी अधीक्षकांना निवेदन दिले होते व खतांची काळाबाजारी होत असल्याचा आरोपही केला होता. शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटानी दरवर्षी ग्रस्त असतो. यंदा दोन्ही संकटे मानगुटीवर असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने संपूर्ण शेती पाण्यात गेली असता कपाशीसाठी गरजेचे असलेली खतेही उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर विक्रेते खतच उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. परंतु, प्रशासकीय स्तरावर ही बाब मान्य नसल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीनंतर कृषी सभापती वैद्य यांनी खताच्या तुटवड्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खापर फोडले. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार मेट्रिक टन अधिकचे खत प्राप्त झाल्याचे सांगितले. मध्य प्रदेश, वर्धा तालुक्यातील सेलू, अमरावतीचा काही भाग येथील शेतकरी नागपूर जिल्ह्यातून खते खरेदी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात खतांची उपलब्धतायुरियाबद्दल बोलताना त्यांनी सांगतले की, गेल्यावर्षी ४५ हजार मेट्रिक टन युरिया मंजूर होता. यंदा ५१ हजार १६० मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती. त्यानंतरही आतापर्यंत ५६ हजार १८९ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला. त्यात ४५ हजार ४२१ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून अद्याप १० हजार ७६८ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी २१ हजार २९० मेट्रिक टन मंजूर होते. त्यात २४ हजार ३६८ मेट्रिक टन उपलब्ध झाले. तर २२ हजार ६३२ मेट्रिक टन विक्री झाली असून १,७३६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर