शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरी नक्षलवादीच मुख्य सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:48 IST

शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले. भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवरील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे शहरी नक्षलवादावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआनंदमोहन मिश्रा यांचे मत : भूमकाल संघटनेचे चर्चासत्र

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले.भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवरील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे शहरी नक्षलवादावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर मार्गदर्शन केले. अन्य वक्त्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे व संघटनेचे अध्यक्ष अरविंद सोहनी यांचा समावेश होता.नक्षल चळवळ शहरी नक्षलवाद्यांद्वारे संचालित केली जाते. ते या चळवळीसाठी पैसा, रसद व शस्त्रे पुरवितात. त्यांनी निरागस आदिवासींची डोकी भडकवून सशस्त्र सेना उभी केली आहे. त्या सेनेमार्फत दबाव टाकून व अमानुष अत्याचार करून चळवळीमध्ये नवीन भरती केली जाते. आदिवासी मुळात नक्षलवादी नाहीत. परंतु, छळापासून वाचण्याचा दुसरा पर्याय नसल्यामुळे ते नक्षल चळवळीत सामील होतात. खरे नक्षलवादी अशा भोळ्याभाबड्या आदिवासींना मरण्यासाठी पुढे करतात व स्वत: पळून जातात. अशाआदिवासींविरुद्ध खटले दाखल झाल्यानंतर त्यांना कुणी वाचवायलाही येत नाही. खरे नक्षलवादी कायद्याच्या सापळ्यात अडकल्यानंतर मात्र त्यांची सुटका करण्यासाठी महागड्या वकिलांची फौज उभी केली जाते. परिणामी आधी शहरी नक्षलवाद्यांना संपवले पाहिजे. त्यानंतर जंगलातील नक्षलवादी आपोआप संपतील, असे मिश्रा यांनी पुढे बोलताना सांगितले.अलीकडे कारवाई करण्यात आलेल्या शहरी नक्षलवाद्यांचा कोरेगाव भीमातील घटनेशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. त्यांना या घटनेसाठी जबाबदार धरले जात असल्यामुळे प्रकरण कमकुवत झाले आहे. त्यांच्याविरुद्ध पंतप्रधानांना ठार मारण्याचा कट रचण्यासारखे महत्त्वाचे पुरावे आहेत. केवळ याच आधारावर त्यांना शिक्षा केली जाऊ शकते, याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले.शहरी व ग्रामीण नक्षलवाद असा भेद करणे चुकीचे आहे. हा भेद करणे हेच राजकारण आहे, असे मत देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले तर, नक्षली चळवळ देशाच्या व समाजाच्या विकासाकरिता घातक ठरत आहे, असे अरविंद सोहनी यांनी सांगितले. संघटनेचे सचिव श्रीकांत भोवते यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर