शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नागपूर मनपा आरोग्य केंद्रांचे ‘अपग्रेडेशन’थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:01 IST

टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्षआरोग्य केंद्रातही सुविधांचा अभावगरीब रुग्णांना कशा मिळणार आरोग्य सुविधा?

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गरीब रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी महापालिके चा आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात २०१७ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार टाटा ट्रस्ट राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) शहरातील आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन करत आहे. अत्याधुनिकीकरण करण्यात आलेल्या केंद्रात गरजूंना माफक दरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.महापालिकेची तीन आंतररुग्णालये आहेत. यात इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल व पाचपावली सुतिकागृहाचा समावेश आहे. दोन बाह्य रुग्णालये असून यात सदर रोगनिदान केंद्र, महाल येथील रोग निदान कें द्राचा समावेश आहे. सात अ‍ॅलोपॅथी व दहा आयुर्वेदिक, तीन होमिओपॅथी, तीन युनानी दवाखाने आहेत.एक प्राकृतिक चिकि त्सा केंद्र तर एक पंचकर्म चिकि त्सा केंद्र आहे. रुग्णालयांचा व्याप मोठा आहे. परंतु डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. प्रभारी डॉक्टरांच्या बळावर कारभार सुरू आहे. तसेच सुविधांचाही अभाव असल्याने उत्तम दर्जाचे उपचार मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नाही. टाटा ट्रस्टच्या उपक्रमामुळे शहरातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु प्रस्तावित आठ आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे. वास्तविक टाटा ट्रस्टला जागा उपलब्ध केल्या असत्या तर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असते. पुन्हा नवीन आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन व्हावे, यासाठी आग्रह धरता आला असता. आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाच्या सुविधा मिळण्याची शक्यता दिसत आहे. दुसरीकडे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळत असतानाही जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पदाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.१८ केंद्रांचे गतीने झाले कामकरारानुसार टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्र अत्याधुनिक होणार होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८ आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याने अत्याधुनिकीकरणाचे काम गतीने झाले. मात्र तिसºया टप्प्यातील आठ आरोग्य केंद्रासाठी मागील सहा-सात महिन्यात जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे काम रखडल्याने २०२० पर्यत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नाही.मनपाच्या जागा वापराविना पडूनशहराच्या विविध भागात महापालिकेच्या जागा वापराविना पडून आहेत. बंद पडलेल्या शाळांची संख्या ५० च्या आसपास आहे. या जागा तशाच पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. काही झोन कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून जागा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्राचे अत्याधुनिकीकरण थांबले आहे. यामुळे महापालिक ा नागरिकांच्या आरोग्याविषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.३८ हजार रुग्णांची माहिती संकलितटाटा ट्रस्टच्या माध्यमातून अपगे्रड करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात सुसज्ज इमारत, ओपीडी कक्ष, सीसीटीव्ही, टीव्ही, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. पिण्याचे पाणी, शौंचालये अशा मूलभूत सुविधा आहेत. माफक दरात रुग्णांना गंभीर आजारावर उपचार मिळत आहे. विशेष म्हणजे येथे येणाºया रुग्णांचा रेकॉर्ड तयार केला जातो. आजवर यात ३८ रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही आरोग्य केंद्रातून उपचार मिळणे शक्य झाले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका