शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा आरोग्य केंद्रांचे ‘अपग्रेडेशन’थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:01 IST

टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्षआरोग्य केंद्रातही सुविधांचा अभावगरीब रुग्णांना कशा मिळणार आरोग्य सुविधा?

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गरीब रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी महापालिके चा आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात २०१७ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार टाटा ट्रस्ट राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) शहरातील आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन करत आहे. अत्याधुनिकीकरण करण्यात आलेल्या केंद्रात गरजूंना माफक दरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.महापालिकेची तीन आंतररुग्णालये आहेत. यात इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल व पाचपावली सुतिकागृहाचा समावेश आहे. दोन बाह्य रुग्णालये असून यात सदर रोगनिदान केंद्र, महाल येथील रोग निदान कें द्राचा समावेश आहे. सात अ‍ॅलोपॅथी व दहा आयुर्वेदिक, तीन होमिओपॅथी, तीन युनानी दवाखाने आहेत.एक प्राकृतिक चिकि त्सा केंद्र तर एक पंचकर्म चिकि त्सा केंद्र आहे. रुग्णालयांचा व्याप मोठा आहे. परंतु डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. प्रभारी डॉक्टरांच्या बळावर कारभार सुरू आहे. तसेच सुविधांचाही अभाव असल्याने उत्तम दर्जाचे उपचार मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नाही. टाटा ट्रस्टच्या उपक्रमामुळे शहरातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु प्रस्तावित आठ आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे. वास्तविक टाटा ट्रस्टला जागा उपलब्ध केल्या असत्या तर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असते. पुन्हा नवीन आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन व्हावे, यासाठी आग्रह धरता आला असता. आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाच्या सुविधा मिळण्याची शक्यता दिसत आहे. दुसरीकडे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळत असतानाही जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पदाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.१८ केंद्रांचे गतीने झाले कामकरारानुसार टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्र अत्याधुनिक होणार होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८ आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याने अत्याधुनिकीकरणाचे काम गतीने झाले. मात्र तिसºया टप्प्यातील आठ आरोग्य केंद्रासाठी मागील सहा-सात महिन्यात जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे काम रखडल्याने २०२० पर्यत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नाही.मनपाच्या जागा वापराविना पडूनशहराच्या विविध भागात महापालिकेच्या जागा वापराविना पडून आहेत. बंद पडलेल्या शाळांची संख्या ५० च्या आसपास आहे. या जागा तशाच पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. काही झोन कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून जागा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्राचे अत्याधुनिकीकरण थांबले आहे. यामुळे महापालिक ा नागरिकांच्या आरोग्याविषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.३८ हजार रुग्णांची माहिती संकलितटाटा ट्रस्टच्या माध्यमातून अपगे्रड करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात सुसज्ज इमारत, ओपीडी कक्ष, सीसीटीव्ही, टीव्ही, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. पिण्याचे पाणी, शौंचालये अशा मूलभूत सुविधा आहेत. माफक दरात रुग्णांना गंभीर आजारावर उपचार मिळत आहे. विशेष म्हणजे येथे येणाºया रुग्णांचा रेकॉर्ड तयार केला जातो. आजवर यात ३८ रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही आरोग्य केंद्रातून उपचार मिळणे शक्य झाले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका