शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

आगामी निवडणुका ईव्हीएमनेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 22:12 IST

देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांचे संकेतलोकसभा व विधानसभा निवडणूक एकावेळी शक्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रावत मंगळवारी नागपुरात आले होते. रविभवनात पत्रकारांशी संवाद साधताना रावत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घ्यायच्या असेल तर संविधानात बदल करावा लागेल. समजा निवडणुका झाल्यास देशात एकाच वेळी ४५ लाख मशीन लागतील. आयोगाकडे १५ ते १६ लाख मशीन्स आहे. २३ लाख मशीन्सच्या आॅर्डर दिल्या आहेत. व्हीव्हीपॅट मशीन ३० सप्टेंबरऐवजी ३० नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. त्यानंतरही देशात एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही. ईव्हीएमने निवडणुका घेणे सुरक्षित आणि समस्यारहित आहे. भंडारा येथील लोकसभा निवडणुकीत जे घडले, त्यात ईव्हीएमची चूक नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.१७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेटने मतदान घेण्याची मागणी केली आहे. सर्व पक्ष भेटायला येणार आहेत. ते आल्यास त्यांच्या शंकांचे समाधान करून देणार आहे. त्यांच्याकरिता रविवारीसुद्धा आयोगाचे कार्यालय खुले राहील. ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शंका दूर करण्यासाठी गेल्यावर्षी आयोगाने राजकीय पक्ष, विशेषज्ञ, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना मशीन हॅक करून दाखवावी, असे खुले आव्हान दिले होते. तेव्हा दोनच पक्षाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनीही केवळ शिकण्यासाठी आल्याचे सांगितले होते. मशीनबाबत लोकांमध्ये चिंता असून त्यावर जागरूकता आणण्याचा आयोग प्रयत्न करीत आहे. लगतच्या देशामध्ये बॅलेटने निवडणूक झाली. विरोधी पक्षांनी बॅलेटमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला. जगात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. रेल्वे तिकिटांचे बुकिंग घरबसल्या आॅनलाईन होत आहे. दिल्लीत बसून भोपाळ येथील प्रॉपर्टी टॅक्स आॅनलाईन भरण्याची सोय झाली आहे. ही सर्व कामे मिनिटात होतात. अशास्थितीत कुणीही तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे सोडून रांगेत लागून रेल्वे तिकीट काढण्याची मागणी करणार नाही, असे सांगून त्यांनी ईव्हीएम मशीनचे महत्त्व सांगितले. यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल उपस्थित होते.ईव्हीएममध्ये गडबड शक्य नाही ईव्हीएमकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. या मशीनमध्ये गडबड करणे शक्य नाही. कुणीही यावे आणि समाधान करून घ्यावे. ईव्हीएमने २० ते २२ वर्षांपासून मतदान घेण्यात येत आहे. ही मशीन ०.५ ते ०.७ टक्के खराब होण्याची शक्यता असते. गेल्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट लावले होते. व्हीव्हीपॅट मशीन नवीन आहे. त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत आहेत, शिवाय या मशीनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीनमध्ये कंट्रोल सेन्सार बसविले आहे. आर्द्रतेमुळे पेपर जड होतो आणि चूक होते, असे रावत यांनी मान्य केले.सोशल मिडियावरील खोट्या वृत्तावर बॅन रावत म्हणाले, निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणाºया खोट्या वृत्तांवर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी सोशल मीडियावर निवडणूक संदर्भातील प्रसारित होणाºया खोट्या वृत्तावर बॅन लावण्याचा आयोगाचा विचार आहे. या संदर्भात सोशल मीडियाच्या अधिकाऱ्यांनी आयोगाच्या विचारावर सहमती दर्शविली आहे. आचारसंहितेबाबत रावत म्हणाले, ज्या राज्यात किंवा ज्या भागात पोटनिवडणूक असेल तिथेच आचारसंहिता राहील. काम करायचे असेल तर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा आयोगाने जाहीर करण्यापूर्वीच एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केली होती. या संदर्भात आयोगाने कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले.देशाची यंत्रणा सक्षमएनआरसी ड्राफ्टच्या संदर्भात रावत म्हणाले, ड्राफ्टला अंतिम स्वरूप आल्यानंतर आसाममधील ४० लाख लोकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी देशाच्या नागरिकत्वाचे प्रमाण, त्याचे १८ वर्षे पूर्ण असावे आणि त्याला महिन्यांपासून राहत असलेल्या निवासाचा पत्ता द्यावा लागेल. बाहेरच्या देशातील नागरिक भारतात येतात, ही चिंतेची बाब आहे. पण देशाची यंत्रणा सक्षम आहे. काम करणारे भरपूर लोक आहेत. त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची गरज नाही, असे रावत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर