शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

आगामी निवडणुका ईव्हीएमनेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 22:12 IST

देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांचे संकेतलोकसभा व विधानसभा निवडणूक एकावेळी शक्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रावत मंगळवारी नागपुरात आले होते. रविभवनात पत्रकारांशी संवाद साधताना रावत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घ्यायच्या असेल तर संविधानात बदल करावा लागेल. समजा निवडणुका झाल्यास देशात एकाच वेळी ४५ लाख मशीन लागतील. आयोगाकडे १५ ते १६ लाख मशीन्स आहे. २३ लाख मशीन्सच्या आॅर्डर दिल्या आहेत. व्हीव्हीपॅट मशीन ३० सप्टेंबरऐवजी ३० नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. त्यानंतरही देशात एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही. ईव्हीएमने निवडणुका घेणे सुरक्षित आणि समस्यारहित आहे. भंडारा येथील लोकसभा निवडणुकीत जे घडले, त्यात ईव्हीएमची चूक नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.१७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेटने मतदान घेण्याची मागणी केली आहे. सर्व पक्ष भेटायला येणार आहेत. ते आल्यास त्यांच्या शंकांचे समाधान करून देणार आहे. त्यांच्याकरिता रविवारीसुद्धा आयोगाचे कार्यालय खुले राहील. ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शंका दूर करण्यासाठी गेल्यावर्षी आयोगाने राजकीय पक्ष, विशेषज्ञ, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना मशीन हॅक करून दाखवावी, असे खुले आव्हान दिले होते. तेव्हा दोनच पक्षाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनीही केवळ शिकण्यासाठी आल्याचे सांगितले होते. मशीनबाबत लोकांमध्ये चिंता असून त्यावर जागरूकता आणण्याचा आयोग प्रयत्न करीत आहे. लगतच्या देशामध्ये बॅलेटने निवडणूक झाली. विरोधी पक्षांनी बॅलेटमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला. जगात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. रेल्वे तिकिटांचे बुकिंग घरबसल्या आॅनलाईन होत आहे. दिल्लीत बसून भोपाळ येथील प्रॉपर्टी टॅक्स आॅनलाईन भरण्याची सोय झाली आहे. ही सर्व कामे मिनिटात होतात. अशास्थितीत कुणीही तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे सोडून रांगेत लागून रेल्वे तिकीट काढण्याची मागणी करणार नाही, असे सांगून त्यांनी ईव्हीएम मशीनचे महत्त्व सांगितले. यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल उपस्थित होते.ईव्हीएममध्ये गडबड शक्य नाही ईव्हीएमकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. या मशीनमध्ये गडबड करणे शक्य नाही. कुणीही यावे आणि समाधान करून घ्यावे. ईव्हीएमने २० ते २२ वर्षांपासून मतदान घेण्यात येत आहे. ही मशीन ०.५ ते ०.७ टक्के खराब होण्याची शक्यता असते. गेल्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट लावले होते. व्हीव्हीपॅट मशीन नवीन आहे. त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत आहेत, शिवाय या मशीनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीनमध्ये कंट्रोल सेन्सार बसविले आहे. आर्द्रतेमुळे पेपर जड होतो आणि चूक होते, असे रावत यांनी मान्य केले.सोशल मिडियावरील खोट्या वृत्तावर बॅन रावत म्हणाले, निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणाºया खोट्या वृत्तांवर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी सोशल मीडियावर निवडणूक संदर्भातील प्रसारित होणाºया खोट्या वृत्तावर बॅन लावण्याचा आयोगाचा विचार आहे. या संदर्भात सोशल मीडियाच्या अधिकाऱ्यांनी आयोगाच्या विचारावर सहमती दर्शविली आहे. आचारसंहितेबाबत रावत म्हणाले, ज्या राज्यात किंवा ज्या भागात पोटनिवडणूक असेल तिथेच आचारसंहिता राहील. काम करायचे असेल तर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा आयोगाने जाहीर करण्यापूर्वीच एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केली होती. या संदर्भात आयोगाने कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले.देशाची यंत्रणा सक्षमएनआरसी ड्राफ्टच्या संदर्भात रावत म्हणाले, ड्राफ्टला अंतिम स्वरूप आल्यानंतर आसाममधील ४० लाख लोकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी देशाच्या नागरिकत्वाचे प्रमाण, त्याचे १८ वर्षे पूर्ण असावे आणि त्याला महिन्यांपासून राहत असलेल्या निवासाचा पत्ता द्यावा लागेल. बाहेरच्या देशातील नागरिक भारतात येतात, ही चिंतेची बाब आहे. पण देशाची यंत्रणा सक्षम आहे. काम करणारे भरपूर लोक आहेत. त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची गरज नाही, असे रावत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर