शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कळमन्यात एक लाख पोत्यांपर्यंत लाल मिरचीची आवक !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 20, 2024 19:55 IST

सर्वाधिक सेस वसुलीनंतरही बाजारात पायाभूत सुविधांचा अभाव

नागपूर: यावर्षी कळमना बाजारात लाल मिरचीची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव उतरले आहेत. गत सोमवारी ९० हजार ते १ लाख पोते (प्रति पोते ४० ते ५० किलो) आणि या आठवड्यात सोमवारी ५० ते ६० हजार पोत्यांची आवक झाली. भाव प्रति किलो १३० ते २१० रुपयादरम्यान आहे. तेजा-४ ब्रॅण्ड १८० ते २१० रुपये किलो विकला जात आहे. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता आहे.

कळमना मिरची बाजार असोसिएशनचे अध्यक्ष महेश बांते म्हणाले, कळमना मिरची बाजार आठवड्यात केवळ सोमवारी सुरू असतो. याच दिवशी लिलाव होतो. लिलावानंतर माल बाजारात ठेवला जातो. यावर्षी डिसेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण भीती दूर होऊन मालाची विक्रमी आवक आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी झाले आहेत. मिरचीची मागणी देशविदेशात आहे. सध्या मांढळ, राजुरा, चंद्रपूर, कागजनगर, आरमोरी, भिवापूर, वणी, वरोरा, बुलढाणा, चिखली, सिरोंचा, वरूड, मोर्शी, तारसा, मौदा येथून मिरचीची आवक आहे. जानेवारीपासून सुरू झालेली आवक मे महिन्यापर्यंत राहील. 

यंदा मिरचीला जास्त मागणीयावर्षी मिरचीचे उत्पादन वाढले असून आवक वाढली आहे. सोबतच अन्य देशांमधून मागणीत वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात सोमवारी आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव १० ते २० रुपये किलोने कमी आहेत.

सर्वाधिक सेस वसुली; मात्र रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांचा अभावमहेश बांते म्हणाले, एमपीएमसीला कळमना मिरची बाजारातून सर्वाधिक सेसची वसुली करण्यात येते. पण सुविधांचा अभाव आहे. या बाजारलगतचा भाजी बाजार अन्य ठिकाणी नेण्याचे म्हटले जाते. पण त्यावर अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्षांपासून समस्या सोडविल्या जात नाहीत. व्यापाऱ्यांकडे माल जास्त असल्याने ठेवण्यासाठी जागा नाही. गेल्यावर्षी या बाजारातील लाखो रुपयांची मिरची आगीत जळाली होती. वर्षानंतरही आग विझविण्याची सक्षम व्यवस्था अद्यापही उभारली नाही. केवळ निविदा काढण्याची माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी बाथरूमची व्यवस्था नाही. भाजी बाजारात ट्रक रस्त्यावर उभे राहत असल्याने मिरची बाजारात पोहोचण्यात अडचणी येतात. अनेकदा ट्रक मिरची बाजारात पोहोचण्यासाठी रस्त्यातील अडथळे व्यापारी व शेतकऱ्यांना दूर करावे लागतात. पिण्याचे पाणी, शौचालय आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या बाजाराकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

चोरीचे प्रमाण वाढलेमिरची बाजारात मालाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरीचे व्हिडिओ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दाखविल्यानंतरही कारवाई आणि उपाययोजना शून्य आहेत. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून त्यांची आंदोलनाची भूमिका आहे.

कळमना मिरची बाजारात किलो दर :तेजा-४ १८०-२१०मांढळ १४०-१५५मांढळ तेजा १६०-१७५बीडी १३०-१५०५५३१ ब्रॅण्ड १३०-१५०आरमोरी १४०-१५०भिवापूर १६०-२००

टॅग्स :nagpurनागपूर