शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, आंबाही गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:39 IST

Untimely rains damaged crops, Nagpur news नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची नासाडी झाली. गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ठळक मुद्देनागपुरात पडला ३.८ मिलिमीटर पाऊस : आज वादळी पाऊस, सावधगिरीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची नासाडी झाली. गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नागपुरात सकाळी ७ नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार, ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. मात्र, काटोल आणि नरखेड तालुक्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही किरकोळ पावसाची नोंद झाली. कामठी तालुक्यात काही गावांमध्ये तसेच नरखेड तालुक्यात जलालखेडा आणि मेंढला येथे चांगला पाऊस झाला. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. खांबाडा, खडीपौनी, कलानगोंदी या गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळाल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

शेतीला फटका

नरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळी ७ च्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात कापून ठेवलेल्या चणा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी चण्याचे पीक कापणीला आले आहे, तर काही ठिकाणी जमिनीवर कापून टाकले आहे. गहू, चणा, भाजीपाला, पिकाला मोठा फटका बसला. बुधवारी रात्रीपासून नरखेड तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी अंबाडा, थंडीपवनी, तारा उतारा, खलानगोंदी परिसरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता. शासनाने तातडीने पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गतवर्षी कोरोनामुळे त्रस्त झालो होतो. परत कोरोनाची दुसरी लाट उसळली. आता तर अवकाळी पाऊसही पाठ सोडत नाही. गहू, चणा, पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यावी.

- मिथून कठाने, शेतकरी तारा (जलालखेडा)

वातावरण थंडावले

ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून, तापमानही खालावले होते. सकाळी १० नंतर पाऊस गायब झाला. नागपुरातील तापमानाच ५.२ अंश सेल्सिअसची घट होऊन तापमान ३१.६ अंश सेल्सिअसवर आले. चंद्रपूरातील तापमानही ४.८ अंशाने खालावून ३३.६ अंश सेल्सिअसवर आले. अकोला, वाशिम, गडचिरोली यवतमाळ वगळता सर्वच जिलह्यात तापमान खालावले होते. गोंदीयामध्ये ३२ अंशाची तर वर्धामध्ये ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.

आज वादळी पाऊस

वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून, १९ मार्चला वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळाचा वेग असेल, असेही वर्तविण्यात आले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या चार जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. २० तारखेलाही विदर्भातील सर्वच जिल्ह्यात गेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी