शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, आंबाही गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:39 IST

Untimely rains damaged crops, Nagpur news नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची नासाडी झाली. गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ठळक मुद्देनागपुरात पडला ३.८ मिलिमीटर पाऊस : आज वादळी पाऊस, सावधगिरीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची नासाडी झाली. गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नागपुरात सकाळी ७ नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार, ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. मात्र, काटोल आणि नरखेड तालुक्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही किरकोळ पावसाची नोंद झाली. कामठी तालुक्यात काही गावांमध्ये तसेच नरखेड तालुक्यात जलालखेडा आणि मेंढला येथे चांगला पाऊस झाला. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. खांबाडा, खडीपौनी, कलानगोंदी या गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळाल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

शेतीला फटका

नरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळी ७ च्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात कापून ठेवलेल्या चणा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी चण्याचे पीक कापणीला आले आहे, तर काही ठिकाणी जमिनीवर कापून टाकले आहे. गहू, चणा, भाजीपाला, पिकाला मोठा फटका बसला. बुधवारी रात्रीपासून नरखेड तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी अंबाडा, थंडीपवनी, तारा उतारा, खलानगोंदी परिसरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता. शासनाने तातडीने पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गतवर्षी कोरोनामुळे त्रस्त झालो होतो. परत कोरोनाची दुसरी लाट उसळली. आता तर अवकाळी पाऊसही पाठ सोडत नाही. गहू, चणा, पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यावी.

- मिथून कठाने, शेतकरी तारा (जलालखेडा)

वातावरण थंडावले

ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून, तापमानही खालावले होते. सकाळी १० नंतर पाऊस गायब झाला. नागपुरातील तापमानाच ५.२ अंश सेल्सिअसची घट होऊन तापमान ३१.६ अंश सेल्सिअसवर आले. चंद्रपूरातील तापमानही ४.८ अंशाने खालावून ३३.६ अंश सेल्सिअसवर आले. अकोला, वाशिम, गडचिरोली यवतमाळ वगळता सर्वच जिलह्यात तापमान खालावले होते. गोंदीयामध्ये ३२ अंशाची तर वर्धामध्ये ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.

आज वादळी पाऊस

वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून, १९ मार्चला वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळाचा वेग असेल, असेही वर्तविण्यात आले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या चार जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. २० तारखेलाही विदर्भातील सर्वच जिल्ह्यात गेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी