शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

Arvind Kejriwal: '...तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, मी देवाकडे मागतो ही मागणी’, अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 20:12 IST

Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे.

नागपूर - दिल्ली आणि पंजाबमधील विजयांनंतर आता आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. दरम्यान, आज लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राजकारण आणि देशाच्या विकासाबाबतचं आपलंय व्हीजन स्पष्ट केलं. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुम्ही मंदिरात जाता का? मीसुद्धा मंदिरात जातो. तुमच्याप्रमाणे मीही देवाकडे मागणे मागतो. मी देवाकडे नेहमी दोन मागण्या मागतो. त्यातील पहिली म्हणजे देवा माझा भारत देश लवकरात लवकर जगातील एक नंबरचा देश बनू दे. तसेच त्यामध्ये माझा काही तरी हातभार लागू दे.  दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत मी भारताला जगात एक नंबरचा  देश  झालेले पाहत नाही तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, असे गुपित अरविंद केजरीवाल यांनी उघड केले.

यावेळी २०२४ च्या रणनीतीबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, २०२४ ची निवडणूक हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही आहे. निवडणुका हे लक्ष्य नाही. तर आमचं लक्ष्य भारत आहे. भारत माता आहे. आम्ही आपलं करिअर सोडून भारतमातेसाठी आलो आहोत. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा ४९ दिवसांत मुख्यमंत्री सोडलं. जगात असं दुसरं उदाहरण नसेल. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल कुणासोबत नॅशनल अलायन्स करणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण मला ह्या १० पक्षांची आघाडी २० पक्षांची आघाडी करणार यामधील काही कळत नाही. मला कुणालाही हरवायचं नाही आहे. मला देशाला जिंकवायचं आहे. २०२४ मध्ये मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे. मी देशातील डॉक्टर, सीए, पत्रकार, शेतकरी यांची आघाडी उभी करणार आहे. अशा १३० कोटी लोकांना पुढे न्यायचं आहे, असे सांगत केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारण