शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नागपुरात  ३१ऑगस्टपर्यंत दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 19:04 IST

नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देजलप्रदाय समितीचा निर्णय : उपलब्ध जलसाठा विचारात घेऊ न पुढील निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. याचा विचार करता नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी वाढ विचारात घेऊ न पाणीकपात कायम ठेवायची की नाही याचा निर्णय ३१ ऑगस्टला घेतला जाईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील आठवड्यात चांगला पाऊ स झाला तरच धरणाची पातळी वाढेल; अन्यथा शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.२२ ऑगस्टपर्यंत पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात आला होता. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाला असता तर पाणीकपात बंद झाली असती. परंतु प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.चौराई धरणाचे दरवाजे बंदमध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पात ९३ टक्के जलसाठा झाला आहे. १५ ऑगस्टला पाणीपातळी वाढल्याने या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तोतलाडोहाच्या जलसाठ्यात थोडी सुधारणा झाली. मात्र २२ ऑगस्टला या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. तोतलाडोहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप चांगला पाऊ स झालेला नाही. नागपूर शहराचा पाणीपुरठा, वीज प्रकल्प, सिंचन व कळमेश्वरला पाणीपुरवठा करण्यासाठी या प्रकल्पात किमात ६०० दलघमी जलसाठा आवश्यक आहे. सध्या प्रकल्पात वापरता येईल असा ८२.३३ दलघमी जलसाठा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात