शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नागपुरात  ३१ऑगस्टपर्यंत दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 19:04 IST

नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देजलप्रदाय समितीचा निर्णय : उपलब्ध जलसाठा विचारात घेऊ न पुढील निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. याचा विचार करता नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी वाढ विचारात घेऊ न पाणीकपात कायम ठेवायची की नाही याचा निर्णय ३१ ऑगस्टला घेतला जाईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील आठवड्यात चांगला पाऊ स झाला तरच धरणाची पातळी वाढेल; अन्यथा शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.२२ ऑगस्टपर्यंत पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात आला होता. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाला असता तर पाणीकपात बंद झाली असती. परंतु प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.चौराई धरणाचे दरवाजे बंदमध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पात ९३ टक्के जलसाठा झाला आहे. १५ ऑगस्टला पाणीपातळी वाढल्याने या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तोतलाडोहाच्या जलसाठ्यात थोडी सुधारणा झाली. मात्र २२ ऑगस्टला या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. तोतलाडोहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप चांगला पाऊ स झालेला नाही. नागपूर शहराचा पाणीपुरठा, वीज प्रकल्प, सिंचन व कळमेश्वरला पाणीपुरवठा करण्यासाठी या प्रकल्पात किमात ६०० दलघमी जलसाठा आवश्यक आहे. सध्या प्रकल्पात वापरता येईल असा ८२.३३ दलघमी जलसाठा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात