शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

पंचाहत्तरीच्या देशाचे अस्थिर, अस्वस्थ तारुण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:10 IST

नागपूर : भारत हा तरुणांचा देश आहे म्हणून अभिमान बाळगायचा की त्यांची स्वप्नं अपूर्णच असल्याची खंत. तरुण पिढी वर्तमान ...

नागपूर : भारत हा तरुणांचा देश आहे म्हणून अभिमान बाळगायचा की त्यांची स्वप्नं अपूर्णच असल्याची खंत. तरुण पिढी वर्तमान जगताना भविष्याचा वेध घेणारी आहे. मात्र या वर्तमानात राेजगाराचा प्रश्न भेडसावत असेल, महिलांना सुरक्षेसाठी अस्थिर, अस्वस्थ वाटत असेल तर महासत्तेची स्वप्नं दूर आहेत, असेच म्हणावे लागेल.

देशाने माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. मात्र तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे विकास नाही. माहिती तंत्रज्ञानाचं युग असतानाही देशात वाढत्या बेरोजगारीचे भीषण संकट आहे. ग्रामीण भागात पोटापाण्याचे प्रश्न अजूनही भेडसावत आहेत.

- आकाश मुरलीधर टाले, विद्यार्थी

---------------------------------------------------------

आज स्त्री ही नेतृत्वकर्ती झालेली बघायला मिळत आहे. स्त्रिया गावगाडा सांभाळण्यापासून देश सांभाळत आहेत. देशात स्त्रीला सुरक्षा आहे म्हणूनच कॉल सेंटरला, वैद्यकीय क्षेत्रात, हॉटेल व्यवसायात अशा अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावत आहे.

- विशाखा गणोरकर, विद्यार्थिनी

------------------------------------------------------------

जगात कुठल्याही देशात नाही एवढे जाती, धर्म, पंथांचे लोक भारतात एकत्रितपणे राहतात. यापेक्षा दुसरे अभिमानास्पद काही असू शकत नाही. घाम गाळणारे शेतकरी, सीमेवर पहारा देणारे सैनिक, आरोग्याचे आव्हान पेलणारे डॉक्टर्स, नर्सेस, २४ तास कर्तव्यावर असणारे पोलीस हे सारे अभिमानास्पद आहे.

- मोनाली भोईटे, विद्यार्थिनी

----------------------------------------------

मताधिकारासाठी युरोप, अमेरिकेसारख्या प्रगत देशातील महिलांनाही संघर्ष करावा लागला, जो भारतीय संविधानाने स्त्रियांना सहज दिला. एवढेच नाही तर आचार-विचारांचे स्वातंत्र्यही दिले आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीनेही महिला धास्तावलेल्या असतात. कुठलेही पाऊल उचलण्याआधी आपल्या सुरक्षेचा विचार करावा लागतो. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.

- रागिणी वेणी, नोकरीपेशा महिला.

-------------------------------------------------------

स्वातंत्र्यानंतर औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली. पण आताच्या सरकारने शेती आणि कृषीवर आधारित उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. अनेक युवक उच्चशिक्षित आहेत; पण त्यांना रोजगार नाहीत. सर्वांना नोकऱ्या देणे शक्य नाही. त्यामुळे व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे.

मधुर बंग, युवा उद्योजक

-------------------------------------------------

स्वातंत्र्योत्तर भारतात भेदभाव न ठेवता सर्वांना समान मताचा संविधानिक अधिकार मिळाला. मताधिकारामुळे सरकार निवडीत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संविधानाने आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिले. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले आहे. मात्र स्त्रियांना सुरक्षेच्या बाबतीत चिंता करावी लागते, ही बाब योग्य नाही.

- आरती नाईक, गृहिणी

----------------------------------------------

नॉर्थ-इस्टमधून प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी मिळवलेले ऑलिम्पिकमधील मेडल हे संघर्षातील यशाचे प्रतीक आहे. देशामध्ये सध्या ग्रीन एनर्जीवर आणि रस्ते बळकटी करण्याच्या गुंतवणुकीवर अधिक भर दिला जात आहे. तळागाळातील माणसांना सुद्धा आपला हक्क मागण्याचा अधिकार देशात आहे.

- श्रेयस बिंड, विद्यार्थी

--------------------------------------

आज असा भारत दिसतो जो गरिबी, भ्रष्टाचार, सांप्रदायिक तणाव आदींमुळे त्रस्त आहे. आजची तरुण पिढी हीच एकमात्र माध्यम आहे. आपल्या या महान भारतराष्ट्रचा वारसा पुढे नेण्याचे. त्यांनी भारताचा इतिहास जाणून इतर लोकांना जागरूक केले पाहिजे आणि एकत्र काम करून एक चांगला आणि आनंदी भारत बनवायला पाहिजे.

- ऋतुजा बरडे, विद्यार्थिनी.