शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 21:16 IST

Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत.

नागपूर : विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. अमरावतीच्या वरूडनंतर आता भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीलाही पूर आला असून मंगळवारी नदीचे पाणी दुथड्या ओव्हरफ्लाे हाेवून वाहत हाेते. मंगळवारी नागपूरातही दिवसा मुसळधार पावसाने हजेरी लावली तर वर्धा जिल्ह्यातही अवकाळीच्या अतिवृष्टीने चांगलेच झाेडपले.

मंगळवारी नागपूरसह भंडारा, गाेंदिया, वर्धा जिल्ह्यात धुवांधार पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यात नदी-नाले तुडूंब भरले आहेत. मार्च ते जूनपर्यंत नेहमी काेरडी राहणारी बावनथडी नदी आठवडाभराच्या पावसाने काठाेकाठ भरली असून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करतात. पुरामुळे धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. उन्हाळ्यात पूर आल्याने नागरिकही हैरान झाले आहेत. दरम्यान सततच्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गाेंदिया जिल्ह्यातही मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. येथे सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर सर्वाधिक फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मक्याचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून काढणे कठीण झाले आहे. वर्धा जिल्ह्यालाही जाेरदार पावसाचा तडाखा बसला. वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस थांबून-थांबून धुवाधार बरसत आहे. सोमवारी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरात मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत १०८ गावांतील ३०४ कुटुंब बाधित झाले आहेत. तर १५७.२६ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर ३२ गोठ्यांची पडझड झाली असून २७५ घरांचे अंशत: तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत एकूण ७५ जनावरांचा मृत्यू झाला.

४४५ टक्के अधिक पाऊस

विदर्भात एप्रिल महिन्यात झालाच तर १७.७ मिमी सरासरी पावसाची नाेंद हाेते पण यंदा ९६.५ मिमी म्हणजे ४४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागपुरात ३४७ टक्के, भंडारा ३७७ टक्के, गाेंदिया ३५१ टक्के, वर्धा ४३४ टक्के, चंद्रपूर ३१४ टक्के, यवतमाळ ७६१ टक्के, अमरावती सर्वाधिक ७७६ टक्के तर बुलढाणा ७०३ व वाशिम ६९६ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस