शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 21:16 IST

Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत.

नागपूर : विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. अमरावतीच्या वरूडनंतर आता भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीलाही पूर आला असून मंगळवारी नदीचे पाणी दुथड्या ओव्हरफ्लाे हाेवून वाहत हाेते. मंगळवारी नागपूरातही दिवसा मुसळधार पावसाने हजेरी लावली तर वर्धा जिल्ह्यातही अवकाळीच्या अतिवृष्टीने चांगलेच झाेडपले.

मंगळवारी नागपूरसह भंडारा, गाेंदिया, वर्धा जिल्ह्यात धुवांधार पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यात नदी-नाले तुडूंब भरले आहेत. मार्च ते जूनपर्यंत नेहमी काेरडी राहणारी बावनथडी नदी आठवडाभराच्या पावसाने काठाेकाठ भरली असून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करतात. पुरामुळे धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. उन्हाळ्यात पूर आल्याने नागरिकही हैरान झाले आहेत. दरम्यान सततच्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गाेंदिया जिल्ह्यातही मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. येथे सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर सर्वाधिक फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मक्याचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून काढणे कठीण झाले आहे. वर्धा जिल्ह्यालाही जाेरदार पावसाचा तडाखा बसला. वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस थांबून-थांबून धुवाधार बरसत आहे. सोमवारी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरात मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत १०८ गावांतील ३०४ कुटुंब बाधित झाले आहेत. तर १५७.२६ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर ३२ गोठ्यांची पडझड झाली असून २७५ घरांचे अंशत: तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत एकूण ७५ जनावरांचा मृत्यू झाला.

४४५ टक्के अधिक पाऊस

विदर्भात एप्रिल महिन्यात झालाच तर १७.७ मिमी सरासरी पावसाची नाेंद हाेते पण यंदा ९६.५ मिमी म्हणजे ४४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागपुरात ३४७ टक्के, भंडारा ३७७ टक्के, गाेंदिया ३५१ टक्के, वर्धा ४३४ टक्के, चंद्रपूर ३१४ टक्के, यवतमाळ ७६१ टक्के, अमरावती सर्वाधिक ७७६ टक्के तर बुलढाणा ७०३ व वाशिम ६९६ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस