शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 21:16 IST

Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत.

नागपूर : विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. अमरावतीच्या वरूडनंतर आता भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीलाही पूर आला असून मंगळवारी नदीचे पाणी दुथड्या ओव्हरफ्लाे हाेवून वाहत हाेते. मंगळवारी नागपूरातही दिवसा मुसळधार पावसाने हजेरी लावली तर वर्धा जिल्ह्यातही अवकाळीच्या अतिवृष्टीने चांगलेच झाेडपले.

मंगळवारी नागपूरसह भंडारा, गाेंदिया, वर्धा जिल्ह्यात धुवांधार पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यात नदी-नाले तुडूंब भरले आहेत. मार्च ते जूनपर्यंत नेहमी काेरडी राहणारी बावनथडी नदी आठवडाभराच्या पावसाने काठाेकाठ भरली असून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करतात. पुरामुळे धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. उन्हाळ्यात पूर आल्याने नागरिकही हैरान झाले आहेत. दरम्यान सततच्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गाेंदिया जिल्ह्यातही मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. येथे सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर सर्वाधिक फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मक्याचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून काढणे कठीण झाले आहे. वर्धा जिल्ह्यालाही जाेरदार पावसाचा तडाखा बसला. वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस थांबून-थांबून धुवाधार बरसत आहे. सोमवारी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरात मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत १०८ गावांतील ३०४ कुटुंब बाधित झाले आहेत. तर १५७.२६ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर ३२ गोठ्यांची पडझड झाली असून २७५ घरांचे अंशत: तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत एकूण ७५ जनावरांचा मृत्यू झाला.

४४५ टक्के अधिक पाऊस

विदर्भात एप्रिल महिन्यात झालाच तर १७.७ मिमी सरासरी पावसाची नाेंद हाेते पण यंदा ९६.५ मिमी म्हणजे ४४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागपुरात ३४७ टक्के, भंडारा ३७७ टक्के, गाेंदिया ३५१ टक्के, वर्धा ४३४ टक्के, चंद्रपूर ३१४ टक्के, यवतमाळ ७६१ टक्के, अमरावती सर्वाधिक ७७६ टक्के तर बुलढाणा ७०३ व वाशिम ६९६ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस