शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

न कळत होऊन गेलेला कोरोनाही धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 20:57 IST

Unknowingly affected corona dangerous सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देएका इसमाची दृष्टी झाली कमी : मेंदूच्या रक्तवाहिनीत तयार झाली रक्ताची गुठळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच पुढे आलेल्या अशाच एका रुग्णाला पॅरालिसीसचा झटका येऊन दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. यामुळे सामान्यांसह डॉक्टरांनीही अधिक जागृक होण्याचे आवाहन केले जात आहे.

मधुमेह, लठ्ठपणा किंवा कुठलाही गंभीर आजाराची लक्षणे नसलेल्या एका ५२ वर्षीय पुरुषाची दृष्टी अचानक कमी झाली. रुग्णाने ऑरेंज सिटी हॉस्पिटल गाठले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभय आगाशे यांनी तपासून चष्म्याचा नंबर दिला. परंतु दोन दिवसानंतर चष्म्याचा उपयोग होत नसल्याची समस्या रुग्णाने मांडली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. डोळ्याचा रेटिना सामान्य होता. परंतु दोन्ही डोळ्यांनी उजव्या भागात कमी दिसत असल्याचे आढळून आले. यामुळे पुढील तपासणीसाठी रुग्णाला मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सोमकुवर यांच्याकडे पाठविले. त्यांनी काही तपासण्या केल्या. यात डोळ्यातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी असल्याचे निदान झाले. त्यांना पॅरालिसीसचा झटका येऊन गेला होता. परंतु यामागील नेमके काय कारण होते ते पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली.ती निगेटिव्ह आली. शेवटी अ‍ॅण्टिबॉडीज तपासणी केली. यात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्डिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. त्यांच्या न कळत त्यांंना कोविड होऊन गेला होता. यामुळे रक्ताची गुठळी होऊन दृष्टी अधू झाली होती. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष नको

नागपूर जिल्ह्यातील कोरोनबाधितांची संख्या १ लाख २६ हजारावर गेली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नव्हती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहरातील ४९ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोरोना होऊन गेला आहे. यामुळे कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे झाले आहे. पोस्ट कोविड उपचाराला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अनुप मरार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर