शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

न कळत होऊन गेलेला कोरोनाही धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 20:57 IST

Unknowingly affected corona dangerous सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देएका इसमाची दृष्टी झाली कमी : मेंदूच्या रक्तवाहिनीत तयार झाली रक्ताची गुठळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच पुढे आलेल्या अशाच एका रुग्णाला पॅरालिसीसचा झटका येऊन दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. यामुळे सामान्यांसह डॉक्टरांनीही अधिक जागृक होण्याचे आवाहन केले जात आहे.

मधुमेह, लठ्ठपणा किंवा कुठलाही गंभीर आजाराची लक्षणे नसलेल्या एका ५२ वर्षीय पुरुषाची दृष्टी अचानक कमी झाली. रुग्णाने ऑरेंज सिटी हॉस्पिटल गाठले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभय आगाशे यांनी तपासून चष्म्याचा नंबर दिला. परंतु दोन दिवसानंतर चष्म्याचा उपयोग होत नसल्याची समस्या रुग्णाने मांडली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. डोळ्याचा रेटिना सामान्य होता. परंतु दोन्ही डोळ्यांनी उजव्या भागात कमी दिसत असल्याचे आढळून आले. यामुळे पुढील तपासणीसाठी रुग्णाला मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सोमकुवर यांच्याकडे पाठविले. त्यांनी काही तपासण्या केल्या. यात डोळ्यातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी असल्याचे निदान झाले. त्यांना पॅरालिसीसचा झटका येऊन गेला होता. परंतु यामागील नेमके काय कारण होते ते पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली.ती निगेटिव्ह आली. शेवटी अ‍ॅण्टिबॉडीज तपासणी केली. यात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्डिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. त्यांच्या न कळत त्यांंना कोविड होऊन गेला होता. यामुळे रक्ताची गुठळी होऊन दृष्टी अधू झाली होती. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष नको

नागपूर जिल्ह्यातील कोरोनबाधितांची संख्या १ लाख २६ हजारावर गेली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नव्हती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहरातील ४९ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोरोना होऊन गेला आहे. यामुळे कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे झाले आहे. पोस्ट कोविड उपचाराला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अनुप मरार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर