शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

न कळत होऊन गेलेला कोरोनाही धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 20:57 IST

Unknowingly affected corona dangerous सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देएका इसमाची दृष्टी झाली कमी : मेंदूच्या रक्तवाहिनीत तयार झाली रक्ताची गुठळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच पुढे आलेल्या अशाच एका रुग्णाला पॅरालिसीसचा झटका येऊन दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. यामुळे सामान्यांसह डॉक्टरांनीही अधिक जागृक होण्याचे आवाहन केले जात आहे.

मधुमेह, लठ्ठपणा किंवा कुठलाही गंभीर आजाराची लक्षणे नसलेल्या एका ५२ वर्षीय पुरुषाची दृष्टी अचानक कमी झाली. रुग्णाने ऑरेंज सिटी हॉस्पिटल गाठले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभय आगाशे यांनी तपासून चष्म्याचा नंबर दिला. परंतु दोन दिवसानंतर चष्म्याचा उपयोग होत नसल्याची समस्या रुग्णाने मांडली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. डोळ्याचा रेटिना सामान्य होता. परंतु दोन्ही डोळ्यांनी उजव्या भागात कमी दिसत असल्याचे आढळून आले. यामुळे पुढील तपासणीसाठी रुग्णाला मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सोमकुवर यांच्याकडे पाठविले. त्यांनी काही तपासण्या केल्या. यात डोळ्यातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी असल्याचे निदान झाले. त्यांना पॅरालिसीसचा झटका येऊन गेला होता. परंतु यामागील नेमके काय कारण होते ते पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली.ती निगेटिव्ह आली. शेवटी अ‍ॅण्टिबॉडीज तपासणी केली. यात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्डिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. त्यांच्या न कळत त्यांंना कोविड होऊन गेला होता. यामुळे रक्ताची गुठळी होऊन दृष्टी अधू झाली होती. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष नको

नागपूर जिल्ह्यातील कोरोनबाधितांची संख्या १ लाख २६ हजारावर गेली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नव्हती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहरातील ४९ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोरोना होऊन गेला आहे. यामुळे कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे झाले आहे. पोस्ट कोविड उपचाराला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अनुप मरार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर