शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एकमेकांवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 18:37 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या लोकसभा निवडणूक प्रकरणामध्ये शुक्रवारी स्वत:ची बाजू योग्य ठरवण्यासाठी विविध मुद्यांद्वारे एकमेकांवर वार केले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात प्रलंबित निवडणूक प्रकरणात विविध मुद्दे मांडले

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या लोकसभा निवडणूक प्रकरणामध्ये शुक्रवारी स्वत:ची बाजू योग्य ठरवण्यासाठी विविध मुद्यांद्वारे एकमेकांवर वार केले. हा लढा सुमारे तीन तास चालला.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नाना पटोले हेदेखील याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते, पण ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी भ्रष्ट व्यवहाराच्या कारणावरून गडकरी यांची निवड रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. ती याचिका अद्याप प्रलंबित आहे.

याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, गडकरी यांच्या वतीने वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडताना विविध कायदेशीर मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, निवडणूक याचिकेमध्ये भ्रष्ट व्यवहाराविषयी नमूद करण्यात आलेल्या माहितीचा स्त्रोत काय आहे, हे स्पष्ट करणे अनिवार्य आहे. परंतु, पटोले यांची याचिका या तरतुदीची पूर्तता करीत नाही, तसेच त्यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्रही बेकायदेशीर आहे. याशिवाय, दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत दाखल अतिरिक्त अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी पटोले यांनी वारंवार वेळ घेतला. असे असताना त्यांनी दुसऱ्यावर विलंब करीत असल्याचा आरोप करणे निरर्थक आहे, असे ॲड. मनोहर यांनी सांगितले.

पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके यांनी बाजू मांडली. त्यांनी गडकरी यांचे मुद्दे खोडून काढले. गडकरी यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती. तेथून ती प्रत मिळवून निवडणूक याचिकेला जोडण्यात आली आहे. त्यामुळे माहितीचा स्त्रोत स्पष्ट करण्यात आला नाही, हा मुद्दा निराधार आहे. गडकरी यांनी या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करणे गरजेचे आहे, असे ॲड. उके यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणCourtन्यायालयNitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोले