शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बेवफा औरत को काटके आया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:47 IST

रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. त्याच्या या वर्तनाने काही वेळेसाठी पोलिसही गोंधळले. मात्र, लगेच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. काहीशी नाट्यमय वाटणारी ही थरारक घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरात गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरक्ताने माखलेला आरोपी ठाण्यात : स्वत:च दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. त्याच्या या वर्तनाने काही वेळेसाठी पोलिसही गोंधळले. मात्र, लगेच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. काहीशी नाट्यमय वाटणारी ही थरारक घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरात गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास घडली. रामदिनेश मिश्रा (वय ४४) असे आरोपीचे तर मंजुला मिश्रा (वय ३७) असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे.आरोपी मिश्रा हा आचारी असून, त्याला १५ वर्षांची गतिमंद मुलगी आहे. तो संजयनगरातील शिवसेना कार्यालयाजवळ राहत होता. पत्नी मंजुलाचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत, असा त्याला संशय होता. त्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्याने तिला सांभाळण्याचा अनेकदा इशाराही दिला होता. पत्नी असे काहीच नाही म्हणून सांगत होती. मात्र, आरोपीच्या डोक्यातील संशयाचा किडा काही केल्या स्वस्थ बसत नव्हता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास त्याला काय दिसले माहीत नाही, त्याने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर चायनीज चॉपरने पत्नी मंजुलावर आठ ते दहा घाव घालून तिला घरातच रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. ती मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर रक्ताने माखलेल्या कपड्याने तो सरळ अंबाझरी ठाण्यात पोहचला. त्याने ठाणेदार भीमराव खंदाळे यांचा कक्ष गाठून पत्नीला ठार मारून आल्याची माहिती दिली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचे नाव, पत्ता विचारला. त्यानंतर त्याचे घर गाठून पंचनामा करत मंजुलाचा मृतदेह मेडिकलला पाठविला.परिसरात प्रचंड दहशतया थरारक हत्याकांडाने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. पोलीस पोहचेपर्यंत तेथे मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, मिश्रा दाम्पत्याला असलेली १५ वर्षीय मुलगी गतिमंद आहे. तिला काय झाले हे पुरते कळले नसले तरी काही तरी भयावह झाले याची तिला जाणीव झाली होती. त्यामुळे त्या बिचारीची अवस्था सैरभैर झाली होती. पोलिसांनी तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. आरोपी मिश्राला अटक करण्यात आली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर