शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात बेरोजगार अभियंत्याने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 19:24 IST

बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता.बेलतरोडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सधन परिवारातील सदस्य असलेल्या सिद्धांतने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे वडील निवृत्त शासकीय नोकरदार असून बहीण डॉक्टर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार न मिळाल्यामुळे सिद्धांत नैराश्याच्या गर्तेत सापडला होता. त्याची मानसिक अवस्था बिघडल्यामुळे त्याच्यावर रामदासपेठेतील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू होते. या पार्श्वभूमीवर सिद्धांतने गुरुवारी मध्यरात्रीनंतर स्वत:च्या रूममध्ये गळफास लावून घेतला. तत्पूर्वी, त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात आई-वडिलांकडे त्याने क्षमायाचना केली, असे समजते. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास आई-वडील नेहमीप्रमाणे जागे झाले. सिद्धांतच्या रूमकडे बघितले असता त्यांना तो गळफास लावून दिसला. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले आणि सिद्धांतला खाली उतरविले. ओळखीच्या डॉक्टरांना बोलविण्यात आले, त्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे नंतर बेलतरोडी पोलिसांकडे माहिती देण्यात आली. हवालदार वीरेंद्र सवाईथुल यांनी सिद्धांतचे वडील संजय भीमराव कडू यांची तक्रार नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर