शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भीतीच्या छायेखाली; आता भूकेचे संकट; भारत-बांगलादेश सीमा ‘सील’; व्यापार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 05:57 IST

तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार  असल्याने त्यांच्यासमाेर भुकेचे आव्हान उभे ठाकणार आहे.

सुनील चरपे

नागपूर : बांगलादेशात यादवी माजली असून, पंतप्रधान शेख हसीना पळून जाताच लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. बांगलादेशने भारताच्या सीमा साेमवारी सायंकाळी सील केल्या आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून हाेणारी निर्यात थांबल्याने भारतीय शेतमाल निर्यातदारांनी सध्या ‘वेट ॲण्ड वाॅच’ची भूमिका घेतली आहे. तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार  असल्याने त्यांच्यासमाेर भुकेचे आव्हान उभे ठाकणार आहे.

बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल आयात करतात. या वस्तूंची भारतातून बांगलादेशात हाेणारी निर्यात किमान ७५ टक्के आहे. मात्र हिंसाचारानंतर ही निर्यात थांबली आहे., अशी माहिती भारतीय शेतमाल निर्यातदारांनी दिली. १५ दिवसांपूर्वीच बंदलावर ८०० ट्रक अडकून पडले होते.

 दरवाढीला सुरुवात

बांगलादेशात पुरवठा थांबल्याने खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण हाेऊन दरवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांना भारताशिवाय इतर देशांकडून तातडीने शेतमालाची आयात करणे शक्य नाही. त्यामुळे आपण सध्या ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत आहाेत, अशी माहिती भारतीय निर्यातदारांनी दिली.

‘टका’चे अवमूल्यन व काळाबाजार

निर्मित परिस्थितीमुळे बांगलादेशी चलन ‘टका’चे ४८ तासांत ३० टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. बांगलादेशात शेतमालाच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सध्या बांगलादेशात ज्या व्यापाऱ्यांकडे शेतमालाचा थाेडाफार साठा आहे, ते अधिक दाराने विक्री करीत आहेत. हीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास शेतमालाचा काळाबाजार व किमतीने दुपटीपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

दूरगामी परिणाम

nबांगलादेशाची अर्थव्यवस्था कापड उद्याेगावर अवलंबून आहे. मात्र आताबांगलादेशच्या कापड निर्यात व अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे.

nयादवीमुळे बांगलादेशचे ९० टक्के, तर भारताचे १० टक्के आर्थिक नुकसान झाले आहे. कापड निर्यातीत बांगलादेशचा वाटा २४ टक्के आहे.

nयादवीमुळे ही आयात आणि त्यांची कापड निर्यात प्रभावित झाली आहे. याचा फायदा भारतीय कापड निर्यातदारांना नक्की हाेऊ शकताे.