शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 06:49 IST

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली.

नागपूर : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानंतर उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला होता का? याची चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत मागविण्यात येईल, अशी घोषणा गृह विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी अहमदनगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांमार्फत सुरू असलेल्या धर्मांतरणाचा मुद्दा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. त्यावेळी अपक्ष आमदार रवी राणा यांनी कोल्हे यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांनी ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. फोन करून पोलिस यंत्रणेवर दबाव आणला. धार्मिक कारणातून ही हत्या झाली असताना या हत्येला दरोड्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी राणा यांनी केली. त्यावर प्रभारी मंत्री देसाई यांनी उद्धव ठाकरे यांची चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसांत गुप्तचर आयुक्तांमार्फत मागविण्यात येईल, अशी घोषणा केली.    

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांचीही चौकशी  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे मिराबाई हरेल या महिलेने पंजाब येथून आलेल्या ख्रिश्चन मिशनरी कमल सिंग याच्याकडून धर्मांतरासाठी आमिष दाखविले म्हणून तक्रार करूनही तेथील पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट धर्मांतरण करणाऱ्याला पाठीशी घातले, असा आरोप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात केला. याप्रकरणी दराडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सातपुते यांनी केली.  त्यावर देसाई यांनी दराडे यांची जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करून  त्यांची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले.   

‘...तर, कडू आणि राणा यांचीही चाैकशी करा’ आमदार रवी राणा एवढे महत्त्वाचे असेल तर आधी त्यांनी खोके घेण्याचा ज्यांच्यावर आरोप केला त्या बच्चू कडूंची चाैकशी व्हावी. तसेच बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपामुळे रवी राणा यांचीही चाैकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.  उमेश कोल्हे प्रकरणात उद्धव ठाकरे यांची चाैकशी करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनंतर दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना हा पलटवार केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन