शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 06:49 IST

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली.

नागपूर : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानंतर उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला होता का? याची चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत मागविण्यात येईल, अशी घोषणा गृह विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी अहमदनगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांमार्फत सुरू असलेल्या धर्मांतरणाचा मुद्दा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. त्यावेळी अपक्ष आमदार रवी राणा यांनी कोल्हे यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांनी ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. फोन करून पोलिस यंत्रणेवर दबाव आणला. धार्मिक कारणातून ही हत्या झाली असताना या हत्येला दरोड्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी राणा यांनी केली. त्यावर प्रभारी मंत्री देसाई यांनी उद्धव ठाकरे यांची चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसांत गुप्तचर आयुक्तांमार्फत मागविण्यात येईल, अशी घोषणा केली.    

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांचीही चौकशी  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे मिराबाई हरेल या महिलेने पंजाब येथून आलेल्या ख्रिश्चन मिशनरी कमल सिंग याच्याकडून धर्मांतरासाठी आमिष दाखविले म्हणून तक्रार करूनही तेथील पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट धर्मांतरण करणाऱ्याला पाठीशी घातले, असा आरोप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात केला. याप्रकरणी दराडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सातपुते यांनी केली.  त्यावर देसाई यांनी दराडे यांची जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करून  त्यांची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले.   

‘...तर, कडू आणि राणा यांचीही चाैकशी करा’ आमदार रवी राणा एवढे महत्त्वाचे असेल तर आधी त्यांनी खोके घेण्याचा ज्यांच्यावर आरोप केला त्या बच्चू कडूंची चाैकशी व्हावी. तसेच बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपामुळे रवी राणा यांचीही चाैकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.  उमेश कोल्हे प्रकरणात उद्धव ठाकरे यांची चाैकशी करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनंतर दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना हा पलटवार केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन