शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उमा भारतीही संघ दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:15 IST

मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.

ठळक मुद्देतर्कवितर्कांना जोर : लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रेशीमबाग स्मृतीभवन येथे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या चार ते पाच महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच राज्याच्या विधानसभा निवडणुका असतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघामधील महत्त्वाच्या नेत्यांच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांशी समन्वय राहावा किंवा असा समन्वय साधला जावा, असे प्रयत्न करण्यासाठी ही बैठक होती, असेही म्हटले जात आहे. मात्र, बैठकीचे नेमके कारण काय, बैठकीत आणखी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, हे अजून समोर आले नाही.मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. उमा भारती या नागपुरात मा.गो. वैद्य यांना भेटण्यासाठी येत-जात असतात. परंतु शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या नागपुरात पोहोचताच थेट संघ मुख्यालयात गेल्या. यानंतर त्यांनी मा.गो. वैद्य यांचीही भेट घेतली. उमा भारती या नागपूरला आल्या की, पत्रकारांशी थेट खुली चर्चा करतात. परंतु आजची बैठक मात्र त्यांनी अतिशय गोपनीय ठेवली होती. तसेच संघ मुख्यालयाबाहेर असलेल्या पत्रकारांशी कुठलीही चर्चा न करताच त्या निघून गेल्या. विशेष म्हणजे संघांच्या अनेक पदाधिकाºयांनाही त्यांच्या भेटीची माहिती नव्हती.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय