शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

उल्हासनगर घटनेची सखोल चौकशी व्हावी; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: February 3, 2024 19:24 IST

सरकार योग्य कारवाई करेल

नागपूर : उल्हासनगर हल्ला प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य कारवाई करेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोलपर्यंत जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोराडी (नागपूर) येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, आपण घेतलेल्या माहितीनुसार गायकवाड यांच्या जिवावर आले म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले, असे गायकवाड म्हणत आहेत. सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही. चूक कुणाचिही असली तरी, असे अपेक्षित नाही. हे संस्कार आपले नाहीत. समाजाला यातून वाईट संदेश जातो, समाजापर्यंत वाईट संदेश पोहोचू नये. यात ज्याची चूक असेल त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अशा घटनांमुळे पक्षाची काही प्रमाणात बदनामी होते. मात्र चौकशी होऊन घटना समजून घेतली जाईल.विरोधी पक्षाचे कामच राजीनाम्याची मागणी करण्याचे आहे, असे ते म्हणाले.

अडवाणीजींना भारतरत्न, आनंदाची, अभिमानाची बाबया देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत आनंददायी, सुखद व भिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणीजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. अंत्योदयाकरिता संपूर्ण आयुष्य अटलजींच्या नेतृत्त्वात समर्पित केले. भाजपाला शुन्यातून जगातला सर्वांत मोठा पक्ष करण्यात त्यांचा मोठे योगदान आहे. देशासाठी केलेल्या सर्मपणाचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला आहे.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेGanpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाड