शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरेंचं भाषण शिवाजी पार्कसारखं, शेतकऱ्यांचा नामोल्लेखही नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:01 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी फक्त शिवाजी पार्कवरचं भाषण केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलं नाही, असे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास सभात्याग केला. 

राज्यपालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षासारखे असल्याचे सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, असंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देऊ असं घोषित केलं होतं मात्र, त्यांच्या पदरी काहीही पडलं नाही. त्यांच्या भाषणात शेतकरी हा विषयदेखील आला नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, स्वा. सावरकरांच्या संदर्भातले मुद्दे असतील याला बगल दिली. आमची एकच अपेक्षा होती, त्यांनी स्वत: वचन दिलं होतं की, अवकाळी पावसाळाग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करू. मात्र, एक रुपयाचीही मदत केली नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं राज्यपालांच्या अभिभाषणाला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं नावही घेतलं नाही, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो असेही फडणवीस यांनी म्हटलंय. त्यानंतर, भाजपा आमदारांसह फडणवीस यांनी सभात्याग केला. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन