शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

'उद्धव ठाकरेंचं भाषण शिवाजी पार्कसारखं, शेतकऱ्यांचा नामोल्लेखही नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:01 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी फक्त शिवाजी पार्कवरचं भाषण केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलं नाही, असे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास सभात्याग केला. 

राज्यपालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षासारखे असल्याचे सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, असंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देऊ असं घोषित केलं होतं मात्र, त्यांच्या पदरी काहीही पडलं नाही. त्यांच्या भाषणात शेतकरी हा विषयदेखील आला नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, स्वा. सावरकरांच्या संदर्भातले मुद्दे असतील याला बगल दिली. आमची एकच अपेक्षा होती, त्यांनी स्वत: वचन दिलं होतं की, अवकाळी पावसाळाग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करू. मात्र, एक रुपयाचीही मदत केली नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं राज्यपालांच्या अभिभाषणाला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं नावही घेतलं नाही, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो असेही फडणवीस यांनी म्हटलंय. त्यानंतर, भाजपा आमदारांसह फडणवीस यांनी सभात्याग केला. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन