शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा वाढला - चंद्रशेखर बावनकुळे

By योगेश पांडे | Updated: November 7, 2023 20:49 IST

कॉंग्रेस व नाना पटोलेंनी आता तरी पराभव मान्य करावा 

नागपूर : ग्रामपंचायत निवडणूकीच्या जय पराजयाबाबत सत्ताधारी-विरोधकांकडून दावे प्रतिदावे सुरूच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप व महायुतीचीच सरशी झाल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीकडे असणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती भाजपाकडे आल्या आहेत. महायुती सरकारने थेट सरपंच निवडून आणण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पळवापळवी थांबली आहे. नाना पटोले यांनी पराभव मान्य करायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागपुरात मंगळवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्य शासन मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आता ते आरक्षणाची भाषा करत आहेत. आज जे दिवस महाराष्ट्रात दिसत आहे, जी जाळपोळ सुरू आहे व ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आला आहे त्यासाठी उद्धव ठाकरेच हेच जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत मिळाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते तर मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकवून ठेवले असते. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला असता, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी काम करावे असे ठरले होते. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू नये, असेच भुजबळ म्हणत आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे