शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल"

By कमलेश वानखेडे | Updated: April 13, 2024 17:08 IST

नीलम गोऱ्हे यांची टीका : रामटेक मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी.

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रचंड मोठा द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. ते त्यांच्या मनातील बोलत आहेत. जामिनीवरील लोकांचे काय मत आहे, हे ४ जूनला सिद्ध होईल. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, राजकीय दृष्ट्या जनाधार संपला एवढे मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, अशी टीका विधान परिदेच्या उपसभापती व शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सकाळी त्या नागपुरात दाखल झाल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गजानन कीर्तिकर यांनी ईडी, सीबीआय संदर्भात व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असावे, त्यांच्या वैयक्तिक मतासंदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेईल. संजय राऊत यांचा प्रचंड ज्ञानी आहे, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच आहे.राहुल गांधी यांनी स्वत:च केलेले जाहीरनामे आणि मनमोहन सिंग यांच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून तर टाकणार नाही ना, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

भावना गवळी यांना सामावून घेऊ- खा. भावना गवळी यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहणार नाही. त्यांना सामावून घेऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. भावना गवळी यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

अवकाळी नुकसानीच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश- विदर्भात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल आहे. प्रचार सुरू होण्याअगोदर त्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश दिलेले आहे. पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे आहे. पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करणार कसे, किती नुकसान झाले. याचा अंदाज घेण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे असते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे