शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

By आनंद डेकाटे | Updated: September 14, 2025 18:41 IST

पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचे पाप लपवतात.

नागपूर : क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे हे राजकारण करीत आहेत. त्यांच्याच खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. त्यामुळे पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचे पाप हे उद्धव सेनेने केले, असा टोला महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. भारत–पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि विरोधकांबाबत बावनकुळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढला आहे. मात्र उद्धव ठाकरे आज क्रिकेटवरून राजकारण करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे परदेशी पर्यटनासाठी गेले होते; देशावर हल्ला झाल्यावर त्यांनी तातडीने परत यायला हवे होते, परंतु ते परतले नाहीत. यावरून हिंदू धर्माबद्दल आणि देशाबद्दल त्यांच्या मनात किती कळवळा आहे हे जनतेला दिसून आले. पहलगाम घटनेनंतरही ते लंडनमध्ये थांबले होते, असेही त्यांनी नमूद केले. खेळाच्या संदर्भात राजकारण सुरु करणे चुकीचे आहे; खेळ हा खेळ म्हणून बघावा, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही; त्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

 ते बॅनर लोकांनी स्वयंस्फूर्तीने लावले नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘देवा तूच सांग’ जाहिरातीबाबत बावनकुळे म्हणाले की , महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला आणि स्वयंस्फूर्तीने बॅनर लावले आहेत. १२ गड-किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आमचे सरकार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करत आहे. जाहिरातीमुळे कुणाला पोटदुखी होत असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला समजत आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAsia Cup 2025आशिया कप २०२५