शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

‘उडान’ विमानाचे प्रवासी रस्तामार्गे जबलपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:48 IST

रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे खराब हवामानामुळे विमान वळविले : विमानतळावर १७ तास विमान उभे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.अलायन्स एअरलाईन्सचे (एअर इंडियाची उपकंपनी) रिजनल कनेक्टिव्हिटीचे दिल्ली-जबलपूर ९आय ६१७ विमान मंगळवारी रात्री १०.४७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. हे विमान व्हीटी-आरकेके ७२ सीटांचे आहे. विमानात ५५ प्रवासी होते. दिल्लीहून उड्डाण भरून जबलपूरजवळ पोहोचताच वैमानिकांना हवामान खराब असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नागपूर एटीसीला परवानगी मागितल्यानंतर विमान उतरविण्यात आले. काही वेळानंतर विमानातील १५ प्रवाशांनी जबलपूरला नेण्याची मागणी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे, विमानतळ व्यवस्थापक श्रीराम पाठक आणि ड्युटी व्यवस्थापक अनिल सोनकुसरे यांनी पाच कारची व्यवस्था करून, या प्रवाशांना जेवणाचे पॅकेट देऊन रवाना केले. तर उर्वरित ४० प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. त्यांनाही बुधवारी सकाळी १२ कारने जबलपूरला पाठविण्यात आले.एफडीटीएलच्या कारणामुळे अडकले विमानप्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतरही विमान दिल्लीला निघाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नागपुरात पोहोचल्यानंतर वैमानिकांची फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट (एफडीटीएल) संपली होती. नियमानुसार दोन लॅण्डिंग आणि टेकआॅफनंतर वैमानिकांना किमान ११ तासांचा विश्राम अनिवार्य आहे. याच कारणामुळे वैमानिकांनाही हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. विमान १७ तास विमानतळावर थांबल्यानंतर दुपारी ४ वाजता रिक्त दिल्लीला रवाना झाले.दोन विमाने रद्द तर नऊ विमानांना विलंबबुधवारी इंडिगोची दिल्ली आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने काही कारणांमुळे रद्द करण्यात आली, तर नऊ विमानांना नागपुरात पोहोचण्यास १५ मिनिटे ते पाच तासांपर्यंत उशीर झाला. गो एअरचे जी८ २६०१ मुंबई-नागपूर विमान ५४ मिनिटे उशिराने सकाळी ९.१० वाजता, इंडिगोचे ६ई ४८२ मुंबई-नागपूर विमान ४२ मिनिटे उशिरा सकाळी १०.३७ वाजता, इंडिगोचे ६ई १३४ पुणे-नागपूर विमान १.४८ तास विलंबाने दुपारी २.२८ वाजता, इंडिगोचे ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमान १.३० तास उशिरा २.५५ वाजता, इंडिगोचे ६ई ४०३ मुंबई-नागपूर विमानाला तब्बल ४.५५ तास विलंब तर इंडिगोचे ६ई ६६३ कोलकाता-नागपूर विमान २.४० तास विलंबाने आले. पावसामुळे मुंबईतून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर झाला.

टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासी