शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘उडान’ विमानाचे प्रवासी रस्तामार्गे जबलपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:48 IST

रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे खराब हवामानामुळे विमान वळविले : विमानतळावर १७ तास विमान उभे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.अलायन्स एअरलाईन्सचे (एअर इंडियाची उपकंपनी) रिजनल कनेक्टिव्हिटीचे दिल्ली-जबलपूर ९आय ६१७ विमान मंगळवारी रात्री १०.४७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. हे विमान व्हीटी-आरकेके ७२ सीटांचे आहे. विमानात ५५ प्रवासी होते. दिल्लीहून उड्डाण भरून जबलपूरजवळ पोहोचताच वैमानिकांना हवामान खराब असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नागपूर एटीसीला परवानगी मागितल्यानंतर विमान उतरविण्यात आले. काही वेळानंतर विमानातील १५ प्रवाशांनी जबलपूरला नेण्याची मागणी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे, विमानतळ व्यवस्थापक श्रीराम पाठक आणि ड्युटी व्यवस्थापक अनिल सोनकुसरे यांनी पाच कारची व्यवस्था करून, या प्रवाशांना जेवणाचे पॅकेट देऊन रवाना केले. तर उर्वरित ४० प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. त्यांनाही बुधवारी सकाळी १२ कारने जबलपूरला पाठविण्यात आले.एफडीटीएलच्या कारणामुळे अडकले विमानप्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतरही विमान दिल्लीला निघाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नागपुरात पोहोचल्यानंतर वैमानिकांची फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट (एफडीटीएल) संपली होती. नियमानुसार दोन लॅण्डिंग आणि टेकआॅफनंतर वैमानिकांना किमान ११ तासांचा विश्राम अनिवार्य आहे. याच कारणामुळे वैमानिकांनाही हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. विमान १७ तास विमानतळावर थांबल्यानंतर दुपारी ४ वाजता रिक्त दिल्लीला रवाना झाले.दोन विमाने रद्द तर नऊ विमानांना विलंबबुधवारी इंडिगोची दिल्ली आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने काही कारणांमुळे रद्द करण्यात आली, तर नऊ विमानांना नागपुरात पोहोचण्यास १५ मिनिटे ते पाच तासांपर्यंत उशीर झाला. गो एअरचे जी८ २६०१ मुंबई-नागपूर विमान ५४ मिनिटे उशिराने सकाळी ९.१० वाजता, इंडिगोचे ६ई ४८२ मुंबई-नागपूर विमान ४२ मिनिटे उशिरा सकाळी १०.३७ वाजता, इंडिगोचे ६ई १३४ पुणे-नागपूर विमान १.४८ तास विलंबाने दुपारी २.२८ वाजता, इंडिगोचे ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमान १.३० तास उशिरा २.५५ वाजता, इंडिगोचे ६ई ४०३ मुंबई-नागपूर विमानाला तब्बल ४.५५ तास विलंब तर इंडिगोचे ६ई ६६३ कोलकाता-नागपूर विमान २.४० तास विलंबाने आले. पावसामुळे मुंबईतून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर झाला.

टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासी