शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

‘उडान’ विमानाचे प्रवासी रस्तामार्गे जबलपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:48 IST

रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे खराब हवामानामुळे विमान वळविले : विमानतळावर १७ तास विमान उभे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.अलायन्स एअरलाईन्सचे (एअर इंडियाची उपकंपनी) रिजनल कनेक्टिव्हिटीचे दिल्ली-जबलपूर ९आय ६१७ विमान मंगळवारी रात्री १०.४७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. हे विमान व्हीटी-आरकेके ७२ सीटांचे आहे. विमानात ५५ प्रवासी होते. दिल्लीहून उड्डाण भरून जबलपूरजवळ पोहोचताच वैमानिकांना हवामान खराब असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नागपूर एटीसीला परवानगी मागितल्यानंतर विमान उतरविण्यात आले. काही वेळानंतर विमानातील १५ प्रवाशांनी जबलपूरला नेण्याची मागणी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे, विमानतळ व्यवस्थापक श्रीराम पाठक आणि ड्युटी व्यवस्थापक अनिल सोनकुसरे यांनी पाच कारची व्यवस्था करून, या प्रवाशांना जेवणाचे पॅकेट देऊन रवाना केले. तर उर्वरित ४० प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. त्यांनाही बुधवारी सकाळी १२ कारने जबलपूरला पाठविण्यात आले.एफडीटीएलच्या कारणामुळे अडकले विमानप्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतरही विमान दिल्लीला निघाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नागपुरात पोहोचल्यानंतर वैमानिकांची फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट (एफडीटीएल) संपली होती. नियमानुसार दोन लॅण्डिंग आणि टेकआॅफनंतर वैमानिकांना किमान ११ तासांचा विश्राम अनिवार्य आहे. याच कारणामुळे वैमानिकांनाही हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. विमान १७ तास विमानतळावर थांबल्यानंतर दुपारी ४ वाजता रिक्त दिल्लीला रवाना झाले.दोन विमाने रद्द तर नऊ विमानांना विलंबबुधवारी इंडिगोची दिल्ली आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने काही कारणांमुळे रद्द करण्यात आली, तर नऊ विमानांना नागपुरात पोहोचण्यास १५ मिनिटे ते पाच तासांपर्यंत उशीर झाला. गो एअरचे जी८ २६०१ मुंबई-नागपूर विमान ५४ मिनिटे उशिराने सकाळी ९.१० वाजता, इंडिगोचे ६ई ४८२ मुंबई-नागपूर विमान ४२ मिनिटे उशिरा सकाळी १०.३७ वाजता, इंडिगोचे ६ई १३४ पुणे-नागपूर विमान १.४८ तास विलंबाने दुपारी २.२८ वाजता, इंडिगोचे ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमान १.३० तास उशिरा २.५५ वाजता, इंडिगोचे ६ई ४०३ मुंबई-नागपूर विमानाला तब्बल ४.५५ तास विलंब तर इंडिगोचे ६ई ६६३ कोलकाता-नागपूर विमान २.४० तास विलंबाने आले. पावसामुळे मुंबईतून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर झाला.

टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासी