शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नागपूरच्या ग्रामीण भागात दारुड्या पोलिसाने दोघींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 7:26 PM

Accident Nagpur News धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले.

ठळक मुद्देधानकापणी करून घराकडे जाताना करुण अंतएक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले. यात दोन महिला ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रिया ढाब्याजवळ मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. रविता वासुदेव राऊत (१८) रा.पचखेडी तर सोनू गुलाब चांदेकर (३४) अशी मृत महिलांची नावे आहे. यात लक्ष्मी श्रीकृष्ण राऊत (३४) ही जखमी झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार वेलतूरवरून सुसाट वेगात दुचाकी क्रमांक एम.एच. ४ ९ / व्ही ४७८१ पचखेडीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी धानकापणीचे काम आटोपून महिला मजूर येत होत्या. दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीचालकाचे लक्ष न राहिल्याने व वेगावरून नियंत्रण सुटल्याने वाहन महिलांना चिरडत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. ही दुचाकी गोवर्धन वातूजी भोयर, रा.ब्राह्मणी चालवित होते. गोवर्धन हा लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो मूळचा ब्राह्मणी येथील राहणार आहे.

या अपघातात रविता व सोनू, लक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर काही वेळपर्यंत त्या जागीच पडून होत्या. एका स्थानिकाने याबाबत ठाणेदार किशोर वैरागडे यांना उपरोक्त अपघाताची माहिती दिली. यानंतर जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे हलविण्यात आले. त्यापैकी रविताचा मृत्यू झाला. तर सोनू हिला नागपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालावली. जखमी लक्ष्मी हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी भोयर याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३३७,३०४ सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भोयर यांच्यासोबत दुचाकीवर आणखी एक जण स्वार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर वैरागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .मदतीअभावी गेला रविताचा व सोनूचा जीवअपघातानंतर शेतमजूर महिला जखमी अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी महिला वेदनेने विव्हळत होत्या. मदतीची याचना करीत होत्या. मात्र काहीजण केवळ मोबाईलवर फोटो काढत राहीले. कुणीही खासगी वाहनाने किंवा रस्त्यावरील वाहन थांबवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले नाही. सोबतच्या महिला जखमींना धीर देत असल्याचे पहायला मिळाले. वेळेवर उपचार मिळाले असते तर रविताचा व सोनूचा जीव वाचला असता. बघ्यांच्या अशा संवेदनहीनतेमुळे रविता व सोनूचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे .

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू