शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:15 IST

Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली.

नागपूर: झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी मोठी बहीण तिच्या मागे गेली. त्यातच लहान बहिणीचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. त्या दोघींनाही वाचविण्यासाठी परिसरात कुणीही नसल्याने त्या दोघींचाही बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारपूर येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी घडली असून, सोमवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.आराध्या विचारकर मांढरे (२) व आकांक्षा विचारकर मांढरे (५) रा. शिकारपूर, ता. कुही अशी बहिणींची नावे आहेत. विचारकर मांढरे यांच्याकडे शेती अथवा उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. विचारकर व त्यांची पत्नी रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. आराध्या व आकांक्षा त्यांच्या आजोबासोबत घरी होत्या. सायंकाळच्या सुमारास आजोबा काही कामानिमित्त गावात गेल्याने दोघीही घरासमोर खेळत होत्या.दरम्यान, खेळता-खेळता आराध्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी आकांक्षा तिच्या मागे गेली. तलावाच्या काठावर ओली माती असल्याने आराध्याचा पाय घसरला व ती तलावातील पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी आकांक्षा पुढे सरसावली व पाय घसरल्याने तीही पाण्यात पडली. घटनेच्यावेळी तलावाजवळ कुणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघी पाण्यात पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.काही वेळाने आजोबा घरी आल्यावर त्यांना दोघीही झोपडीत अथवा अंगणात दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दोघीही तलावात बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांना बोलावले. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व यादवराव कुंभरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर दोघींच्याही पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.तलावाच्या काठी झोपडीशिकारपूर गावापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठी त्यांनी झोपडी बांधली असून, त्यात त्यांचे म्हातारे वडील, पत्नी व दोन मुलींसोबत वास्तव्य आहे. त्यांच्या झोपडीच्या परिसरात दुसरी झोपडी अथवा घर नाही. त्यांना आराध्या व आकांक्षा या दोनच मुली होत्या. घटनेची माहिती मिळताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. एकाचवेळी दोघींचाही मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यू