शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:15 IST

Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली.

नागपूर: झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी मोठी बहीण तिच्या मागे गेली. त्यातच लहान बहिणीचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. त्या दोघींनाही वाचविण्यासाठी परिसरात कुणीही नसल्याने त्या दोघींचाही बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारपूर येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी घडली असून, सोमवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.आराध्या विचारकर मांढरे (२) व आकांक्षा विचारकर मांढरे (५) रा. शिकारपूर, ता. कुही अशी बहिणींची नावे आहेत. विचारकर मांढरे यांच्याकडे शेती अथवा उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. विचारकर व त्यांची पत्नी रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. आराध्या व आकांक्षा त्यांच्या आजोबासोबत घरी होत्या. सायंकाळच्या सुमारास आजोबा काही कामानिमित्त गावात गेल्याने दोघीही घरासमोर खेळत होत्या.दरम्यान, खेळता-खेळता आराध्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी आकांक्षा तिच्या मागे गेली. तलावाच्या काठावर ओली माती असल्याने आराध्याचा पाय घसरला व ती तलावातील पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी आकांक्षा पुढे सरसावली व पाय घसरल्याने तीही पाण्यात पडली. घटनेच्यावेळी तलावाजवळ कुणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघी पाण्यात पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.काही वेळाने आजोबा घरी आल्यावर त्यांना दोघीही झोपडीत अथवा अंगणात दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दोघीही तलावात बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांना बोलावले. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व यादवराव कुंभरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर दोघींच्याही पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.तलावाच्या काठी झोपडीशिकारपूर गावापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठी त्यांनी झोपडी बांधली असून, त्यात त्यांचे म्हातारे वडील, पत्नी व दोन मुलींसोबत वास्तव्य आहे. त्यांच्या झोपडीच्या परिसरात दुसरी झोपडी अथवा घर नाही. त्यांना आराध्या व आकांक्षा या दोनच मुली होत्या. घटनेची माहिती मिळताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. एकाचवेळी दोघींचाही मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यू