शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

By नरेश डोंगरे | Updated: April 14, 2024 20:32 IST

प्रवाशांच्या गैरसोयीची अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : दिल्ली बोर्डाकडे प्रस्ताव, आठवडाभरात सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांची कुचंबना होत असल्याचे सचित्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिर्षस्थ पातळीवरून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, नागपूरहूनच थेट यूपी, बिहारकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला असून तसा प्रस्ताव दिल्ली बोर्डाकडे पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे.

दक्षिणेकडून येणाऱ्या आणि यूपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत नागपूर स्थानकावरून मोठ्या प्रमाणात चढणाऱ्या प्रवाशांची भर पडत आहे. पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या डब्यात शिरून एका पायावर प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे जनरल तर सोडा, स्लिपर आणि एसी कोच मधील प्रवाशांनाही त्रास होऊ लागला आहे.  कोचमधील स्वच्छतागृहाजवळ प्रवासी दाटीवाटीने उभे राहत असल्याने कन्फर्म तिकिट घेऊन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची तीव्र कुचंबना होत आहे.

विशेष म्हणजे, तिकिट असूनही अनेक प्रवासी (ज्येष्ठ नागरिक) आपल्या आसनापर्यंत पोहचण्याचे सोडा, कोचमध्येही शिरू शकत नाही, अशी स्थिती आहे. शनिवारी नागपूर स्थानकावरून संघमित्रा एक्सप्रेसच्या एस-४ मध्ये शिरू पाहणाऱ्या अशाच एका दाम्पत्याला अनधिकृत प्रवाशांनी कोचमधून फलाटावर ढकलून दिले. त्यांचे सामानही फेकून दिले. अशाच प्रकारे प्रचंड गर्दीमुळे अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये रविवारी शेगाव येथील एका कुटुंबातील काही सदस्य डब्यात शिरू शकले तर काही फलाटावरच राहून गेले. गर्दीमुळे प्रवाशांची होत असलेली कुचंबना लक्षात आल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील शिषर्स्थ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी नागपूर स्थानकावरून किमान दोन नवीन गाड्या पटना, दानापूर, बनारस, लखनऊकडे सोडण्याची व्यवस्था करण्याची विनंती या अधिकाऱ्यांनी दिल्ली रेल्वे बोर्डाला केली आहे. दिल्ली स्तरावरूनही या विनंती वजा मागणीवर सकारात्मक विचार सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमतला सांगितले आहे. लवकरच निर्णय होऊन या आठवड्यात एक नवीन रेल्वे गाडी सुरू होईल, अशी अपेक्षा मित्तल यांनी व्यक्त केली आहे.प्रवाशांबाबत संवेदनशिल वर्तन ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देशशनिवारी संघमित्रा एक्सप्रेसमध्ये घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. कुण्या प्रवाशांसोबत कुठे अन्याय झाला असेल तर त्याची संवेदनशिलपणे दखल घ्या. संबंधित प्रवाशांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक देऊन त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करा, असेही या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे