शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

By नरेश डोंगरे | Updated: April 14, 2024 20:32 IST

प्रवाशांच्या गैरसोयीची अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : दिल्ली बोर्डाकडे प्रस्ताव, आठवडाभरात सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांची कुचंबना होत असल्याचे सचित्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिर्षस्थ पातळीवरून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, नागपूरहूनच थेट यूपी, बिहारकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला असून तसा प्रस्ताव दिल्ली बोर्डाकडे पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे.

दक्षिणेकडून येणाऱ्या आणि यूपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत नागपूर स्थानकावरून मोठ्या प्रमाणात चढणाऱ्या प्रवाशांची भर पडत आहे. पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या डब्यात शिरून एका पायावर प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे जनरल तर सोडा, स्लिपर आणि एसी कोच मधील प्रवाशांनाही त्रास होऊ लागला आहे.  कोचमधील स्वच्छतागृहाजवळ प्रवासी दाटीवाटीने उभे राहत असल्याने कन्फर्म तिकिट घेऊन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची तीव्र कुचंबना होत आहे.

विशेष म्हणजे, तिकिट असूनही अनेक प्रवासी (ज्येष्ठ नागरिक) आपल्या आसनापर्यंत पोहचण्याचे सोडा, कोचमध्येही शिरू शकत नाही, अशी स्थिती आहे. शनिवारी नागपूर स्थानकावरून संघमित्रा एक्सप्रेसच्या एस-४ मध्ये शिरू पाहणाऱ्या अशाच एका दाम्पत्याला अनधिकृत प्रवाशांनी कोचमधून फलाटावर ढकलून दिले. त्यांचे सामानही फेकून दिले. अशाच प्रकारे प्रचंड गर्दीमुळे अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये रविवारी शेगाव येथील एका कुटुंबातील काही सदस्य डब्यात शिरू शकले तर काही फलाटावरच राहून गेले. गर्दीमुळे प्रवाशांची होत असलेली कुचंबना लक्षात आल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील शिषर्स्थ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी नागपूर स्थानकावरून किमान दोन नवीन गाड्या पटना, दानापूर, बनारस, लखनऊकडे सोडण्याची व्यवस्था करण्याची विनंती या अधिकाऱ्यांनी दिल्ली रेल्वे बोर्डाला केली आहे. दिल्ली स्तरावरूनही या विनंती वजा मागणीवर सकारात्मक विचार सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमतला सांगितले आहे. लवकरच निर्णय होऊन या आठवड्यात एक नवीन रेल्वे गाडी सुरू होईल, अशी अपेक्षा मित्तल यांनी व्यक्त केली आहे.प्रवाशांबाबत संवेदनशिल वर्तन ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देशशनिवारी संघमित्रा एक्सप्रेसमध्ये घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. कुण्या प्रवाशांसोबत कुठे अन्याय झाला असेल तर त्याची संवेदनशिलपणे दखल घ्या. संबंधित प्रवाशांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक देऊन त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करा, असेही या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे