शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 11:09 IST

पर्यावरण संवर्धनाबाबत खोटे दावे

आशिष रॉय

नागपूर : पॅरिस करारात भारत वर्ष २०३०पर्यंत ५० टक्के वीज उत्पादन नॉन-जीवाश्म इंधनावर (नॉन-फॉसिल फ्यूएल) आधारित प्रकल्पातून करेल, असा उल्लेख आहे. त्यानंतरही महाजनकोने कोळशावर आधारित वीज उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नागपूर सीमेपासून ४ किमी अंतरावर कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर शहर आधीच कोराडी आणि खापरखेड वीज केंद्रामुळे वायू प्रदूषणाचा सामना करीत आहे. आता दोन नवीन वीज उत्पादन युनिट स्थापन करण्याचा निर्णय महाजनकोने घेतल्यामुळे आता नागपूर शहर गॅस चेंबर बनण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, असे म्हटले जात आहे. महाजनकोने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) दोन युनिटच्या पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज केला आहे. मंडळाने दि. २९ मे रोजी या संदर्भात जनसुनवाई घेण्याचे ठरविले आहे. उद्योग भवनातील मंडळाच्या कार्यालयात या संदर्भात सादर केलेला प्रस्ताव उपलब्ध आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) महाजनकोला वर्ष २०१० मध्ये कोराडीच्या ६६० मेगावॉट क्षमतेच्या तिन्ही युनिटमध्ये फ्ल्यू गॅस डिसल्फ्युरिझर्स (एफजीडी) बसविण्याचे निर्देश दिले होते. कंपनीने आतापर्यंत एफजीडी बसविले नाहीत. आता महाजेनकोने दोन्ही प्रस्तावित युनिटमध्ये एफजीडी तत्काळ बसविण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्याच्या कोराडी प्रकल्पातील युनिटला १०० टक्के राखेची विल्हेवाट लावण्यावर यश आले नाही. गेल्या पाच वर्षांत हा आकडा सरासरी ८० टक्के आहे. आता महाजनकोने नवीन युनिटमधून निघणाऱ्या राखेचा उपयोग १०० टक्के करण्याचे आश्वासन दिले आहे. कोराडी केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे राख कन्हान नदीच्या पाण्यात मिसळते आणि पावसाळ्यात प्रकल्पालगतच्या शेतात वाहून जाते. ही नदी नागपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहे.

नवीन युनिट्सचा सर्वात मोठा तोटा वायू प्रदूषण आहे. महाजनकोच्या सल्लागाराने प्रकल्पाजवळ आठ ठिकाणी प्रदूषणांचे मोजमाप केले आणि त्याची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा चांगली आढळली. हे कार्य वर्ष २०२२च्या मार्च आणि मे महिन्यात करण्यात आले होते. पर्यावरणवाद्यांनी महाजनकोच्या आकड्यांना आव्हान देताना हे कार्य डिसेंबर आणि जानेवारी व्हायला हवे होते, असे म्हटले आहे.

विशेष बाबी 

  • कोराडी केंद्राने १३ वर्षांत एफजीडी स्थापन केले नाही. आता महाजनकोने हे कार्य तत्काळ करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • कोराडी प्रकल्पात सध्या ८० टक्के राखेचा उपयोग होत आहे. आता नवीन युनिटसाठी १०० टक्के उपयोगाचा दावा केला आहे.
  • कोराडी कोळसा वीज केंद्र नागपूर मनपाच्या सीमेपासून केवळ ४ किमी अंतरावर आहे.
  • वायू प्रदूषणानंतरही कंपनीने सर्वकाही आटोक्यात असल्याचा दावा केला आहे.
टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजnagpurनागपूर