शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

 नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:24 IST

सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली.

ठळक मुद्देतरुणाला रस्त्यात रोखले : बगमधून रक्कम चोरली : तहसीलमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली.आकाश रोशन गुप्ता (वय २१) हा तरुण व्ही. गोल्ड ज्वेलर्समध्ये काम करतो. त्याच्या मालकाने त्याला बुधवारी सायंकाळी एका बॅगमध्ये घालून पाच लाख रुपये दिले. ते त्याला इतवारीतील एका खासगी लॉकरमध्ये ठेवायचे होते. आकाश तिकडे पायी जात असताना रस्त्यात त्याला दोन आरोपी भेटले. एकाने समोरून तर दुसऱ्याने मागे उभे राहून, त्याची कोण आहे, कुठे जातो, बॅगमध्ये काय ठेवले आहे अशी चौकशी केली. आकाशने त्यांना त्याची माहिती दिली. दरम्यान, एकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर दुसऱ्याने दोन हजारांच्या नोटांचे एक बंडल बॅगमधून काढून घेतले. त्यानंतर काहीच झाले नाही, अशा थाटात आरोपी निघून गेले. आकाश लॉकर असलेल्या ठिकाणी पोहचला. त्याने आपल्या बॅगमधून रोकड काढली तेव्हा तीनच लाख रुपये होते. एक दोन लाखांचे बंडल गायब होते. रस्त्यात रोखणाऱ्या आरोपींनीच ते काढून घेतल्याचे आकाशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मालकांना तशी माहिती दिली. त्यानंतर तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक अंबोरे यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.सीसीटीव्हीची तपासणीदोन लाखांची रोकड लंपास करणाऱ्या त्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा