शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

दोन मैत्रिणी बकरीला वाचवायला गेल्या आणि काळाने घात केला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:19 IST

Nagpur News पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला.

 

नागपूर : पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना अराेली (ता. माैदा) शिवाजीनगर, तुमान शिवारात मंगळवारी (दि. ५) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. त्या दाेघींचेही मृतदेह आढळून आले आहेत.

सुजाता धर्मा उईके (१९) व मनीषा रामप्रसाद ईनवाते (१८, दाेघीही रा. शिवाजीनगर, तुमान, ता. मौदा) अशी मृत मुलींची नावे आहेत. तुमान शिवारातून पेंच धरणाचा डावा कालवा भंडारा जिल्ह्यात गेला आहे. या दाेघीही मंगळवारी (दि. ५) नेहमीप्रमाणे कालव्याच्या काठी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या हाेत्या. चारा खात असतानाच एक बकरी कालव्यात पडली. त्यामुळे बकरीला वाचवण्यासाठी दाेघेही पुढे सरसावल्या.

बकरीला वाचवीत असताना दाेघीही कालव्यात पडल्या व प्रवाहात आल्याने वाहत गेल्या. दाेघीही मंगळवारी रात्रीपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या वडिलांनी त्या बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळी शाेधकार्य सुरू करण्यात आले. सुजाताचा मृतदेह बुधवारी पारडी (कला) (ता. माैदा) शिवारात तर मनीषाचा मृतदेह गुरुवारी (दि. ७) दुपारी रेवराल (ता. माैदा) शिवारातील कालव्यात आढळून आला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फौजदार हंसराज वरखडे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू