शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दोन मैत्रिणी बकरीला वाचवायला गेल्या आणि काळाने घात केला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:19 IST

Nagpur News पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला.

 

नागपूर : पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना अराेली (ता. माैदा) शिवाजीनगर, तुमान शिवारात मंगळवारी (दि. ५) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. त्या दाेघींचेही मृतदेह आढळून आले आहेत.

सुजाता धर्मा उईके (१९) व मनीषा रामप्रसाद ईनवाते (१८, दाेघीही रा. शिवाजीनगर, तुमान, ता. मौदा) अशी मृत मुलींची नावे आहेत. तुमान शिवारातून पेंच धरणाचा डावा कालवा भंडारा जिल्ह्यात गेला आहे. या दाेघीही मंगळवारी (दि. ५) नेहमीप्रमाणे कालव्याच्या काठी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या हाेत्या. चारा खात असतानाच एक बकरी कालव्यात पडली. त्यामुळे बकरीला वाचवण्यासाठी दाेघेही पुढे सरसावल्या.

बकरीला वाचवीत असताना दाेघीही कालव्यात पडल्या व प्रवाहात आल्याने वाहत गेल्या. दाेघीही मंगळवारी रात्रीपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या वडिलांनी त्या बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळी शाेधकार्य सुरू करण्यात आले. सुजाताचा मृतदेह बुधवारी पारडी (कला) (ता. माैदा) शिवारात तर मनीषाचा मृतदेह गुरुवारी (दि. ७) दुपारी रेवराल (ता. माैदा) शिवारातील कालव्यात आढळून आला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फौजदार हंसराज वरखडे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू