शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा, अवकाळीने वाढली शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 11:04 IST

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिणेकडे पाऊस झाल्याने आता त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भात जाणवत आहे.

ठळक मुद्देपिकांना फटका बसण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हिवाळ्यात नागपूरकर थंडीने हुडहुडत असतात, असा दरवर्षीचा अनुभव असला तरी यंदा मात्र थंडी पळाली आहे. अशातच हवामान विभागाने येते दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिणेकडे पाऊस झाल्याने आता त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भात जाणवत आहे. दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. त्याचा परिणाम चणा आणि गव्हाच्या पिकावर होण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा अवकाळीचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे भाजीपाला पीक सडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना दरवाढीचा फटका बसू शकतो. टमाटरच्या दरातही अचानकपणे वाढ झाली आहे.

विदर्भात पाऊस

मागील २४ तासातील नोंदीनुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. दरम्यान मागील २४ तासात गडचिरोलीत २०.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. या सोबतच अकोला १.९, अमरावती १.०, नागपूर २.६ आणि यवतमाळ जिल्ह्यात २.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील २२ व २३ हे दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस