शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

By नरेश डोंगरे | Updated: March 15, 2024 19:58 IST

प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

नागपूर: अनेक वर्षांपासून भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या, नागपुरात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानमधील दोन हजारांवर शरणार्थींसह बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांनाही अखेर भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध अधिक चांगले व्हावे, या उद्देशाने २२ जुलै १९७६ ला समझोता एक्स्प्रेस नामक ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र १८ फेब्रुवारी २००७ ला समझोता एक्स्प्रेस हरियाणातून धावत असताना पानिपतजवळ या गाडीत भयानक बॉम्बस्फोट झाले. त्यात ६८ प्रवाशांचे जीव गेले आणि कित्येकांना कायमचे अपंगत्वही आले. त्यानंतर या ट्रेनमधील नागरिकांच्या आवागमनावर वाद होऊ लागला. या पार्श्वभूमीवर अखेर ८ ऑगस्ट २०१९ पासून समझोता एक्स्प्रेसचे संचालन बंद करण्यात आले.

या गाडीने भारतात आपल्या नातेवाइकांकडे येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी होती. येथे येण्यासाठी कुणी नातेवाइकांकडील कार्यक्रम, कुणी पर्यटन तर कुणी उपचाराचे निमित्त सांगून तसा दीर्घ मुदतीचा व्हिजा (एलटीव्ही) मिळवला होता. येथे थांबल्यानंतर काहींना येथेच रोजगार मिळाल्याने त्यांनी आपल्या व्हिजामध्ये वेळोवेळी वास्तव्यासाठी मुदतवाढ करून घेतली. यातील अडीच हजारांवर नागरिक असे आहेत की त्यांची मुले येथेच शिकून लहानांची मोठीही झाली. मात्र, त्यांच्याकडे अधिकृत भारतीय नागरिकत्व नाही. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ते नागपुरात वास्तव्याला असल्यामुळे ते अधिकृतरीत्या पोलिस रेकॉर्डवरही आहे. त्यामुळे या सर्वांना आता भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा वर्षांची अट११ मार्च २०२४ ला केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय नागरिकत्व (सुधारणा) कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. अर्थात भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे भारतात किमान सहा वर्षे वास्तव्य अपेक्षित आहे. प्रारंभी वास्तव्याची अट ११ वर्षांची होती. ती या कायद्यामुळे शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. सर्वाधिक पाकिस्तानी, अफगाणी फक्त तीनसंबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपुरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्येत पाकिस्तानी आहेत. त्यांची संख्या २१०० ते २२०० दरम्यान आहे. बांगलादेशी नागरिकांची संख्या १५० वर आहे. तर, अफगाणी मात्र केवळ ३ आहेत. हे सर्व आता सरकारच्या वेबपोर्टलवर जाऊन नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

टॅग्स :nagpurनागपूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक