शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

By नरेश डोंगरे | Updated: March 15, 2024 19:58 IST

प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

नागपूर: अनेक वर्षांपासून भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या, नागपुरात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानमधील दोन हजारांवर शरणार्थींसह बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांनाही अखेर भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध अधिक चांगले व्हावे, या उद्देशाने २२ जुलै १९७६ ला समझोता एक्स्प्रेस नामक ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र १८ फेब्रुवारी २००७ ला समझोता एक्स्प्रेस हरियाणातून धावत असताना पानिपतजवळ या गाडीत भयानक बॉम्बस्फोट झाले. त्यात ६८ प्रवाशांचे जीव गेले आणि कित्येकांना कायमचे अपंगत्वही आले. त्यानंतर या ट्रेनमधील नागरिकांच्या आवागमनावर वाद होऊ लागला. या पार्श्वभूमीवर अखेर ८ ऑगस्ट २०१९ पासून समझोता एक्स्प्रेसचे संचालन बंद करण्यात आले.

या गाडीने भारतात आपल्या नातेवाइकांकडे येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी होती. येथे येण्यासाठी कुणी नातेवाइकांकडील कार्यक्रम, कुणी पर्यटन तर कुणी उपचाराचे निमित्त सांगून तसा दीर्घ मुदतीचा व्हिजा (एलटीव्ही) मिळवला होता. येथे थांबल्यानंतर काहींना येथेच रोजगार मिळाल्याने त्यांनी आपल्या व्हिजामध्ये वेळोवेळी वास्तव्यासाठी मुदतवाढ करून घेतली. यातील अडीच हजारांवर नागरिक असे आहेत की त्यांची मुले येथेच शिकून लहानांची मोठीही झाली. मात्र, त्यांच्याकडे अधिकृत भारतीय नागरिकत्व नाही. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ते नागपुरात वास्तव्याला असल्यामुळे ते अधिकृतरीत्या पोलिस रेकॉर्डवरही आहे. त्यामुळे या सर्वांना आता भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा वर्षांची अट११ मार्च २०२४ ला केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय नागरिकत्व (सुधारणा) कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. अर्थात भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे भारतात किमान सहा वर्षे वास्तव्य अपेक्षित आहे. प्रारंभी वास्तव्याची अट ११ वर्षांची होती. ती या कायद्यामुळे शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. सर्वाधिक पाकिस्तानी, अफगाणी फक्त तीनसंबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपुरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्येत पाकिस्तानी आहेत. त्यांची संख्या २१०० ते २२०० दरम्यान आहे. बांगलादेशी नागरिकांची संख्या १५० वर आहे. तर, अफगाणी मात्र केवळ ३ आहेत. हे सर्व आता सरकारच्या वेबपोर्टलवर जाऊन नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

टॅग्स :nagpurनागपूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक