शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नागपुरात तूरडाळ ११०, हरभरा डाळ ७० रुपये! दोन आठवड्यात वाढल्या किमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 11:07 IST

एक महिन्यात तूरडाळ क्विंटलमागे १५०० ते १८०० रुपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शंभरी पार केल्याने तूरडाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे.

ठळक मुद्देमागणी वाढली, गरिबांच्या ताटातून डाळ गायब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन आठवड्यापासून कडधान्याच्या किमतीत वाढ होत असून सर्वच डाळी महाग झाल्या आहेत. किरकोळमध्ये उत्तम दर्जाची तूरडाळ ११० रुपये किलो आणि चणा डाळ ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. ठोकमध्ये एक महिन्यात तूरडाळ क्विंटलमागे १५०० ते १८०० रुपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शंभरी पार केल्याने तूरडाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे.भाज्यांच्या किमती वाढल्यानंतर गरिबांनी तूरडाळीचा उपयोग वाढविला होता. पण आता भाव ११० रुपयांवर पोहोचल्यानंतर खरेदी करणे कठीण झाले आहे. याशिवाय चणा डाळ, मूग मोगर, उडद मोगर, वाटाणा डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवाढीमागे मागणीच्या तुलनेत मालाचा तुटवडा असल्याचे कारण व्यापाऱ्यांनी सांगितले.लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाºयांनी डाळींच्या किमती वाढविल्या नाहीत. पण कच्च्या मालाचा तुटवडा होऊ लागताच फिनिश मालाच्या किमतीत वाढ होऊ लागली. दुसरीकडे काही व्यापारी साठेबाजी करून डाळींच्या किमती वाढवीत आहेत. तूरडाळीची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्यापूर्वीच शासनाने कारवाई करावी, अशी मागणी काही ग्राहक संघटनांनी केली आहे.

व्यापाºयांनी सांगितले, शेतकºयांना जास्त आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी शासनाने मीलर्सला आयातीचा परवाना दिला नाही. त्यामुळे डाळीचे भाव वाढत आहेत. याचप्रकारे किरकोळमध्ये चणा डाळ ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय मूगडाळीची खिचडी खाणेही महाग झाले आहे. मूगडाळ किरकोळमध्ये १०५ रुपयांवर गेली आहे. दोन आठवड्यात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय उडद मोगर किरकोळमध्ये १०० ते १२० रुपये भाव आहेत. केंद्र शासनाने वाटाण्यावर १०० टक्के आयात शुल्क लावल्याने भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे आयातीत वाटाणा ६० रुपये आणि गावरानी ५५ ते ६० रुपये भाव आहेत.तूरडाळीची खरेदी थांबलीकोरोना महामारीमुळे अनेकजण आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत, तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू अर्थात भाजीपाला आणि धान्य व कडधान्य महाग होत आहेत. नवीन तूर बाजारात येण्यास आणखी चार महिने लागतील. सध्या तूरडाळीची किंमत कमी होण्याची शक्यता नाहीच. अशा स्थितीत सरकारने गरीब व सामान्यांचा विचार करावा करून कांद्याप्रमाणेच कठोर निर्णय घ्यावा. नाफेडकडे असलेला तुरीचा साठा बाजारात आणून तूरडाळीच्या किमतीवर नियंत्रण आणावे. या संदर्भात सरकारने तात्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

टॅग्स :agricultureशेती