शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरात तूरडाळ ११०, हरभरा डाळ ७० रुपये! दोन आठवड्यात वाढल्या किमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 11:07 IST

एक महिन्यात तूरडाळ क्विंटलमागे १५०० ते १८०० रुपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शंभरी पार केल्याने तूरडाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे.

ठळक मुद्देमागणी वाढली, गरिबांच्या ताटातून डाळ गायब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन आठवड्यापासून कडधान्याच्या किमतीत वाढ होत असून सर्वच डाळी महाग झाल्या आहेत. किरकोळमध्ये उत्तम दर्जाची तूरडाळ ११० रुपये किलो आणि चणा डाळ ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. ठोकमध्ये एक महिन्यात तूरडाळ क्विंटलमागे १५०० ते १८०० रुपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शंभरी पार केल्याने तूरडाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे.भाज्यांच्या किमती वाढल्यानंतर गरिबांनी तूरडाळीचा उपयोग वाढविला होता. पण आता भाव ११० रुपयांवर पोहोचल्यानंतर खरेदी करणे कठीण झाले आहे. याशिवाय चणा डाळ, मूग मोगर, उडद मोगर, वाटाणा डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवाढीमागे मागणीच्या तुलनेत मालाचा तुटवडा असल्याचे कारण व्यापाऱ्यांनी सांगितले.लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाºयांनी डाळींच्या किमती वाढविल्या नाहीत. पण कच्च्या मालाचा तुटवडा होऊ लागताच फिनिश मालाच्या किमतीत वाढ होऊ लागली. दुसरीकडे काही व्यापारी साठेबाजी करून डाळींच्या किमती वाढवीत आहेत. तूरडाळीची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्यापूर्वीच शासनाने कारवाई करावी, अशी मागणी काही ग्राहक संघटनांनी केली आहे.

व्यापाºयांनी सांगितले, शेतकºयांना जास्त आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी शासनाने मीलर्सला आयातीचा परवाना दिला नाही. त्यामुळे डाळीचे भाव वाढत आहेत. याचप्रकारे किरकोळमध्ये चणा डाळ ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय मूगडाळीची खिचडी खाणेही महाग झाले आहे. मूगडाळ किरकोळमध्ये १०५ रुपयांवर गेली आहे. दोन आठवड्यात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय उडद मोगर किरकोळमध्ये १०० ते १२० रुपये भाव आहेत. केंद्र शासनाने वाटाण्यावर १०० टक्के आयात शुल्क लावल्याने भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे आयातीत वाटाणा ६० रुपये आणि गावरानी ५५ ते ६० रुपये भाव आहेत.तूरडाळीची खरेदी थांबलीकोरोना महामारीमुळे अनेकजण आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत, तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू अर्थात भाजीपाला आणि धान्य व कडधान्य महाग होत आहेत. नवीन तूर बाजारात येण्यास आणखी चार महिने लागतील. सध्या तूरडाळीची किंमत कमी होण्याची शक्यता नाहीच. अशा स्थितीत सरकारने गरीब व सामान्यांचा विचार करावा करून कांद्याप्रमाणेच कठोर निर्णय घ्यावा. नाफेडकडे असलेला तुरीचा साठा बाजारात आणून तूरडाळीच्या किमतीवर नियंत्रण आणावे. या संदर्भात सरकारने तात्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

टॅग्स :agricultureशेती